शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठरावांचे उल्लंघन केल्याच्या आक्षेपावर संयुक्त राष्ट्रांचे मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 01:59 IST

जम्मू-कश्मीरमधील घडामोडींवर बारीक लक्ष; सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन

संयुक्त राष्ट्रे : जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून भारताने सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन केले आहे, या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या प्रवक्त्याने मौन बाळगणे पसंत केले. काश्मीरसंदर्भातील घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बारीक लक्ष ठेवून आहेत, असे मात्र या प्रवक्त्याने आवर्जून सांगितले.कलम ३७० मधील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव भारतीय संसदेने संमत केला, तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, काश्मीरशी संबंधित सर्व जणांनी सध्या संयम बाळगण्याची गरज आहे. काश्मीरबद्दलच्या घडामोडींची सविस्तर माहिती आम्ही घेत आहोत.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरसंदर्भात गेल्या आठवड्यात पाठविलेले पत्र संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना मिळाले आहे का, या प्रश्नावर दुजारिक म्हणाले की, ही माहिती मला प्रसारमाध्यमांतील बातम्यांतूनच कळली. ते पत्र सरचिटणीसांना मिळाले आहे की नाही, याची माहिती घ्यावी लागेल. असे पत्र पाठवले असेल, तर त्याची दखल नक्कीच घेतली जाईल. काश्मीर प्रश्नावरून वाढलेल्या तणावाबद्दल संयुक्त राष्ट्रांना चिंता वाटत आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत व पाकिस्तानची तयारी असल्यास संयुक्त राष्ट्रे मध्यस्थी करण्यास तयार आहेत, अशी भूमिका सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी याआधीही मांडलेली आहे. तीच भूमिका यापुढेही कायम आहे. (वृत्तसंस्था)हा भारताचा अंतर्गत प्रश्नजम्मू-काश्मीरला कोणता दर्जा द्यायचा हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यासंदर्भातील निर्णयामुळे भारताचे इतर देशांशी असलेले संबंध अजिबात बिघडणार नाहीत, असे भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले.ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून त्याला, तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याचा आंतरराष्ट्रीय सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीवर काहीही परिणाम होणार नाही. या प्रदेशांमध्ये आणखी उत्तम कारभार होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370