शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ब्रिटनच्या अनिवासी भारतीय गृहमंत्र्यांनीच भारताविरोधात मोर्चा उघडला; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:35 IST

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते.

ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताविरोधातच मोर्चा उघडला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांची गर्दी वाढू लागेल, असा त्यांचा दावा आहे. 

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या  ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले आहे. त्या लिज ट्रस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. भारत सरकार दीर्घकाळापासून भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी आणि स्टडी व्हिसा वाढविण्याची मागणी करत आला आहे. या करारामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये एन्ट्री सोपी होऊ शकते. परंतू, आधीच ब्रिटनमध्ये जाऊन वसलेल्या या सुएला ब्रेव्हरमन यांनी याला विरोध केला आहे. 

ब्रिटीश मासिक 'द स्पेक्टेटर'ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेव्हरमन म्हणाल्या की, व्हिसा संपला तरी ब्रिटनमध्ये जास्त काळ राहणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचाच जास्त भरणा आहे. माजी गृहमंत्री प्रिती पटेल यांनी गेल्या वर्षी भारतासोबत हा करार केला होता, त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच व्हिसा संपला तरी लोक ब्रिटनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.

यूकेच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2020 मध्ये 20,706 भारतीय इतर देशांच्या नागरिकांपेक्षा जास्त दिवस राहिले. 2020 मध्ये ज्या 473,600 भारतीयांचा व्हिसा 12 महिन्यांच्या आत संपणार होता, त्यापैकी 4,52,894 लोकांनी यूके सोडले, परंतु 4.4 टक्के लोक तिथेच राहिले. भारतीयांसाठी ब्रिटनची सीमा खुली करण्याच्या या धोरणाबाबत मी खूप चिंतित आहे, यासाठीच लोकांनी ब्रेक्झिटला मतदान केलेले नाहीय, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Englandइंग्लंड