शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ब्रिटनच्या अनिवासी भारतीय गृहमंत्र्यांनीच भारताविरोधात मोर्चा उघडला; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:35 IST

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते.

ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताविरोधातच मोर्चा उघडला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांची गर्दी वाढू लागेल, असा त्यांचा दावा आहे. 

ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या  ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले आहे. त्या लिज ट्रस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. भारत सरकार दीर्घकाळापासून भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी आणि स्टडी व्हिसा वाढविण्याची मागणी करत आला आहे. या करारामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये एन्ट्री सोपी होऊ शकते. परंतू, आधीच ब्रिटनमध्ये जाऊन वसलेल्या या सुएला ब्रेव्हरमन यांनी याला विरोध केला आहे. 

ब्रिटीश मासिक 'द स्पेक्टेटर'ला दिलेल्या मुलाखतीत ब्रेव्हरमन म्हणाल्या की, व्हिसा संपला तरी ब्रिटनमध्ये जास्त काळ राहणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचाच जास्त भरणा आहे. माजी गृहमंत्री प्रिती पटेल यांनी गेल्या वर्षी भारतासोबत हा करार केला होता, त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तसेच व्हिसा संपला तरी लोक ब्रिटनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.

यूकेच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2020 मध्ये 20,706 भारतीय इतर देशांच्या नागरिकांपेक्षा जास्त दिवस राहिले. 2020 मध्ये ज्या 473,600 भारतीयांचा व्हिसा 12 महिन्यांच्या आत संपणार होता, त्यापैकी 4,52,894 लोकांनी यूके सोडले, परंतु 4.4 टक्के लोक तिथेच राहिले. भारतीयांसाठी ब्रिटनची सीमा खुली करण्याच्या या धोरणाबाबत मी खूप चिंतित आहे, यासाठीच लोकांनी ब्रेक्झिटला मतदान केलेले नाहीय, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Englandइंग्लंड