शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याने तुर्कस्तानच्या जनतेची जिंकली मनं! म्हणाले, 'धन्यवाद भारत'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 14:43 IST

६ फेब्रुवारी दिवसी तुर्कस्तान सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत २८ हजार जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, अनेक देशांतून मदत पाठवली जात आहे.

६ फेब्रुवारी दिवसी तुर्कस्तान सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत २८ हजार जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, अनेक देशांतून मदत पाठवली जात आहे. भारताने तुर्कस्तानच्या मदतीसाठी तुकड्या पाठवल्या आहेत. भारतीय सेनाने भूकंपात जखमी झालेल्या रुग्णांसाठी ६ तासात एक रुग्णालयात उबा केले असून या रुग्णालयाचा अनेकांना फायदा होत आहे. हे रुग्णालय २४ तास सेवा देत आहे. शून्यापेक्षा कमी तापमान असूनही बचावकर्ते तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली वाचलेल्यांचा शोध घेत आहेत.

भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन दोस्त'चा एक भाग म्हणून उभारण्यात आलेल्या फील्ड हॉस्पिटलने काम सुरू केले आहे. तुर्कीच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी फील्ड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन कक्ष आहेत. हे रुग्णालय हते प्रांतात आहे. ६० पॅरा फील्ड हॉस्पिटल हे भारतीय लष्कराच्या पॅरा-ब्रिगेडचा एक भाग आहे, शाळेच्या इमारतीत आपले हॉस्पिटल उभारले आहे.

Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर

वैद्यकीय मदत देण्यासाठी ९६ भारतीय लष्कराच्या जवानांची टीम हॅते इस्केंडरोन येथे तैनात करण्यात आली आहे. "सुमारे ८०० लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना आवश्यक तेवढा वेळ द्यायला आम्ही तयार आहे, असं ६० पॅरा फील्ड हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल यदुवीर सिंग म्हणाले. १० मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. लष्कराच्या या प्रयत्नाचे अनेकांनी कौतुक केले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने भारताचे आभार मानले. पीडिता म्हणाली, “तुम्ही इथे आलात याचा आम्हाला आनंद आहे.

तुर्कस्तान-सीरियात सोमवारी आलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने भीषण विध्वंस घडवून आणला आहे. भूकंपामुळे सीरियामध्ये ३,५७४ आणि तुर्कीमध्ये २४,६७१ लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या २८,१९१ झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सात शहरांमध्ये सार्वजनिक रुग्णालयांसह सुमारे ६,००० इमारती कोसळल्याचं सरकारने म्हटलं आहे. पहाटे लोक झोपेत असताना हा भूकंप आला. या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि लाखो लोक बाधित झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान