शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं

By admin | Updated: July 16, 2016 18:23 IST

टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत अंकारा, दि. १६ -  तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हे बंड अखेर शमलं असून 5 जनरल्स व 27 कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल 2000 बंडखोरांना अटक करण्यात आली आहे. 1960 पासून लष्करातील अधिकाऱ्यांनी केलेला हा बंडाचा पाचवा प्रयत्न होता. मात्र, हे बंड पूर्णपणे मोडीत काढण्यात आलं असून जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या हातीच सत्तेची सूत्रं असल्याची ग्वाही सरकारनं दिलं आहे.

तुर्कस्तान येथील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच लष्कराच्या या उठावामुले देशभरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या बंडखोर गटाने उठाव करत सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालटाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हेलिकॉप्टरमधून झालेल्या हल्ल्यात व सरकारशी बांधील सैन्याने केलेल्या विरोधात एकंदर 200 जण ठार झाले आहेत. इस्तंबुल व राजधानी अंकारा शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या फुटीर गटाने काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांस बंदी बनवले आहे. राष्ट्राध्यक्ष तय्यीप अर्दोजेन यांनी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणास असल्याचे सांगताना, टर्कीमध्ये लष्कराच्या हातात कधीही सत्ता जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकारच सत्तेत राहील याची ग्वाही दिली.

लोकांनी रस्त्यावर उतरून अर्दोजेन यांच्या सरकारला पाठिंबा दर्शवला

लष्करातील एका गटाने शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला, बंडखोरांनी हेलिकॉप्टरमधून केलेल्या हल्ल्यात १७ पोलिसांसह काही निरपराध नागरिकही मारले गेले असून, एकूण मृतांचा आकडा 200 झाला असून तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बंडखोर सैनिकांनी तुर्कस्तानच्या संसदेवरही बॉम्बहल्ला केला आहे, मात्र पोलिसांनी व इनामदार लष्करी गटांनी प्राणपणाने लढा देत हा हल्ला परतवून लावला आहे. सरकारच्या आदेशानुसार लष्कराने देशव्यापी प्रतिशोध मोहीम हाती घेतली असून तब्बल 1,563 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे दहशतवाद्यांशी लष्कर लडा देते त्याप्रमाणेच लष्करातल्या फुटीरांविरोधात कारवाई करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले आहे.

बंडखोरांना लष्कराने नामोहरम केल्यानंतर लोकांनी असा आनंद व्यक्त केला

दरम्यान,  लोकशाहीला नुकसान पोहोचणाऱ्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत,  देशातील सध्या स्थिती नियंत्रणात आहे. लष्कराची ही चाल यशस्वी होणार नाही, देशातील सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणा-यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे पंतप्रधान येल्डरिन यानी म्हटले आहे. तर राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टर्कीमधल्या सगळ्या राजकीय पक्षांनी विद्यमान सरकारच्या मागे ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या तय्यीप अर्दोजेन यांचेच सरकार सत्तास्थानी रहायला हवे अशी भूमिका ओबामा यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय नागरिकांना तेथील परिस्थिती शांत होईपर्यंत नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे.  भारतीय नागरिकासांठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून तो  +905303142203 असा आहे. तर इस्तांबुल मधील नागरिकासाठी  +905305671095 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.