शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

पाकमध्ये विरोधाचा सूर कायम मात्र चर्चा यशस्वी होण्याची चिन्हे

By admin | Updated: September 9, 2014 04:17 IST

पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.

इस्लामाबाद: पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेल्या इम्रान खान यांनी संसदेबाहेर आपल्या सर्मथकांशी बोलताना, जोपर्यंत पंतप्रधानांना राजीनाम्यासाठी राजी करीत नाही तोपर्यंत आपण परत जाणार नाही असे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना दोन आठवडे धरणे देण्यास सांगितले आहे.पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी)चे मौलवी तहिरुल कादरी हेही खान यांच्या शिबिराजवळच आपली निदर्शने करीत आहेत. त्यांच्या सर्मथकांनी संसदेचा पार्किंग भाग रिकामा केला असून ते कॉन्स्टिट्यूशन एव्हेन्यूजवळ धरणे देत आहेत. सरकार व पीटीआयदरम्यानच्या चर्चेचा एक टप्पा रविवारी येथे पार पडला.या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्याचे सांगून अन्य काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलणी होणे व त्यांचे समाधान होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. देशात उमटत असलेल्या विरोधाच्या सुरापासून देशाला सुरक्षित राखण्याबाबत दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकार पक्षाचे नेतृत्व करणारे अर्थमंत्री इसहाक डार यांनी, अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी सरकारवर आपला हल्ला चालूच ठेवीत, मागील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचा आरोप अनेक नेत्यांवर केला. त्यांनी बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. अब्दुल मलिकसह अन्य नेते या घोटाळ्यात सामील असल्याचे म्हटले. पाकमध्ये मलिक यांची गणना एका स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. दोन आठवडे निदर्शने करण्याचा इम्रान खान यांचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा त्यावर सर्व बाजूंनी टीका होते आहे व दुसरीकडे देश आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पुराच्या संकटाला तोंड देत आहे.