शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये विरोधाचा सूर कायम मात्र चर्चा यशस्वी होण्याची चिन्हे

By admin | Updated: September 9, 2014 04:17 IST

पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.

इस्लामाबाद: पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेल्या इम्रान खान यांनी संसदेबाहेर आपल्या सर्मथकांशी बोलताना, जोपर्यंत पंतप्रधानांना राजीनाम्यासाठी राजी करीत नाही तोपर्यंत आपण परत जाणार नाही असे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना दोन आठवडे धरणे देण्यास सांगितले आहे.पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी)चे मौलवी तहिरुल कादरी हेही खान यांच्या शिबिराजवळच आपली निदर्शने करीत आहेत. त्यांच्या सर्मथकांनी संसदेचा पार्किंग भाग रिकामा केला असून ते कॉन्स्टिट्यूशन एव्हेन्यूजवळ धरणे देत आहेत. सरकार व पीटीआयदरम्यानच्या चर्चेचा एक टप्पा रविवारी येथे पार पडला.या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्याचे सांगून अन्य काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलणी होणे व त्यांचे समाधान होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. देशात उमटत असलेल्या विरोधाच्या सुरापासून देशाला सुरक्षित राखण्याबाबत दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकार पक्षाचे नेतृत्व करणारे अर्थमंत्री इसहाक डार यांनी, अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी सरकारवर आपला हल्ला चालूच ठेवीत, मागील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचा आरोप अनेक नेत्यांवर केला. त्यांनी बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. अब्दुल मलिकसह अन्य नेते या घोटाळ्यात सामील असल्याचे म्हटले. पाकमध्ये मलिक यांची गणना एका स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. दोन आठवडे निदर्शने करण्याचा इम्रान खान यांचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा त्यावर सर्व बाजूंनी टीका होते आहे व दुसरीकडे देश आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पुराच्या संकटाला तोंड देत आहे.