शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भारताच्या गोळीबारात पाकिस्तानचे तिघे ठार, पाक लष्कराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:31 IST

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात आपल्या एका सैनिकासह ३ जण ठार झाले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यात अन्य चार नागरिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

इस्लामाबाद : भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात आपल्या एका सैनिकासह ३ जण ठार झाले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यात अन्य चार नागरिक जखमी झाल्याचेही पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.पाकिस्तानने म्हटले की, भारतीय लष्कराने रावळकोट भागात नागरी वस्त्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात एका महिलेसह दोन नागरिक ठार झाले, तसेच एक जण जखमी झाला. या परिसरात गस्त घालणारे एक पाकिस्तानी लष्करी पथकही या हल्ल्यात सापडले. त्यात नायब सुभेदार नदीम हा सैनिक ठार झाला. अन्य तीन सैनिक जखमी झाले.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कर भारतीय सीमा चौक्यांवर तसेच काश्मीर व जम्मूमधील नागरी वस्त्यांवर गोळीबार करीत आहे. त्यात भारतीय जवान व भारतीय नागरिक मरण पावले आहेत. त्यानंतर भारताने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानला दिला होता. मात्र पाकिस्तानच्या आरोपानंतर भारतीय लष्कराने आपण तिथे गोळीबार केला का, याची माहिती दिलेली नाही. (वृत्तसंस्था)नवाज शरीफ यांच्याकडेच पुन्हा पक्षाचे नेतृत्व?इस्लामाबाद : न्यायालयाने अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेला लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे नेतृत्व सांभाळू शकतो, अशा आशयाचे विधेयक पाकिस्तानात प्रस्तावित असून त्याला मंजुरी मिळाल्यास नव्या कायद्यानुसार, माजी पंतप्रधान नवाज शरीफ पीएमएल-एनचे नेतृत्व पुन्हा करू शकतील, असे सांगण्यात येत आहे. पनामा पेपर घोटाळा प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.विरोधी पक्षांचे आव्हान?मंत्री एम. खान म्हणाले की, विधेयक कनिष्ठ सभागृहात सहज मंजूर होईल. तिथे पीएमएल-एनचे बहुमत आहे. संमतीनंतर नवाज शरीफ पुन्हा पक्षाची धुरा सांभाळू शकतात. मात्र पाकिस्तानातील विरोधी पक्ष या विधेयकाला ला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान