शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:04 IST

बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेची जोरदार चर्चा सुरू आहे. तेथील हिंदू समाजानेही या अटकेला विरोध दर्शवला आहे.

हिंदू धर्मगुरू आणि इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेवरून बांगलादेशात खळबळ उडाली आहे. यावर भारतानेही तीव्र प्रतिक्रिया दिली असून, बांगलादेशनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमधील युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद शोजीब भुईया यांनी म्हटले आहे की, चिन्मय दास यांना हिंदू समाजाचा नेता म्हणून नाही तर देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना आसिफ महमूद म्हणाले, 'बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला धोका निर्माण करणाऱ्या देशद्रोहाच्या कोणत्याही कृतीवर सरकार कठोर कारवाई करेल. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, मग तो नेता कोणीही असो, त्याला सोडले जाणार नाही. 

एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. चिन्मय कृष्ण दास हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे आणि त्यांना संघटित करण्याचे काम करत आहेत. दरम्यान, आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

या अटकेवर आसिफ महमूद यांनी सांगितले की, कायदा सामुदायिक हिताच्या आधारावर नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर काम करतो.

चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशी हिंदूंमध्ये प्रचंड रोष होता आणि अनेक ठिकाणी निदर्शने झाली. दास यांच्या अटकेवर भारताने मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांऐवजी शांततापूर्ण सभांद्वारे न्याय मागण्या मांडणाऱ्या हिंदू धर्मगुरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे. 

चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दलही आम्ही चिंता व्यक्त करतो. हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो, असंही या निवेदनात म्हटले आहे. 

बांगलादेशनेही निवदेन जारी केले 

भारताच्या या वक्तव्यानंतर बांगलादेशनेही एक निवेदन जारी केले आहे. या त चिन्मय दास यांच्या अटकेचा काही वर्तुळात चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले आहे. भारताचे विधान निराधार आणि मैत्रीच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही अत्यंत निराशेने आणि तीव्र वेदनांनी सांगतो की चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा काही भागांमध्ये गैरसमज झाला आहे. चिन्मय कृष्ण दास यांना वेगवेगळ्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अशी बिनबुडाची विधाने केवळ तथ्यांची चुकीची माहिती देत ​​नाहीत तर दोन शेजारी देशांमधील मैत्री आणि परस्पर समंजसपणाच्या भावनेच्या विरुद्ध आहेत, असंही या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश