शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाने भयंकर रक्तपाताचा धोका

By admin | Updated: May 7, 2015 01:19 IST

दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्र : दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या दुष्ट प्रवृत्तीमुळे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर रक्तपात होईल, असा इशाराही भारताने दिला आहे.अवघ्या मानवजातीसाठी दहशतवादापासून मोठा धोका आहे. दहशतवाद म्हणजे अशी जागतिक दुष्ट प्रवृती असून याचा जागतिक कारवाईनेच नि:पात होऊ शकतो. यासाठी प्रयत्न कमी पडू नयेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी भगवंत बिष्णोई यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत द्वितीय महायुद्धाच्या स्मृती या विषयावरील विशेष अधिवेशनात सांगितले.संयुक्त राष्ट्राचा भारत हा संस्थापक सदस्य असून या संस्थेचे तत्त्व आणि उद्दिष्टांप्रती भारत सदैव बांधील राहील, अशी ग्वाही बिष्णोई यांनी दिली. द्वितीय महायुद्धात भारताचे ८७ हजार जवान शहीद झाले होते,तर हजारो जवान जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)महायुद्धासारखा नरसंहार> दहशतवाद जगभर पसरला आहे. दुसऱ्या महायुद्धासारखा नरसंहार या दहशतवादामुळे होऊ शकतो. > दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ७० वर्षांत प्रगती झालेली असली तरी युद्धाची शक्यता पुरती कमी झालेली नाही. १६ लाख लोकांचा बळी> युद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या घटना कमी होतील; परंतु लोकांवरील प्रभाव वाढला आहे. > १६ व्या शतकात सशस्त्र संघर्षात १६ लाख लोकांचा बळी गेला. ही संख्या २० व्या शतकात वाढून ११ कोटींवर गेली आहे, असा दाखलाही भगवंत बिष्णोई यांनी यावेळी दिला.