शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

या देशांनी लावली समुद्राची ‘वाट’...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 10:37 IST

जगभरात दरवर्षी लाखो मेट्रिक टन प्लास्टीक तयार होते.

जगभरात दरवर्षी लाखो मेट्रिक टन प्लास्टीक तयार होते. निम्म्या प्लास्टीकचा पुनर्वापर होतो, जाळला जातो किंवा मोठा खड्डा खणून पुरला जातो, परंतु जे प्लास्टीक उरते, त्याचा मोठा भाग अखेरीस महासागरांमध्ये जातो. खरं तर हा उर्वरित कचरा इतका आहे की अमेरिकेच्या हवाई आणि कॅलिफोर्नियादरम्यान प्रशांत महासागरात हा कचरा एकत्र येऊन फ्रान्सहून तिप्पट आकाराचा ढीग साचत आहे.

सर्वाधिक प्लास्टिक कचरा उद्याने, समुद्रकिनारे किंवा रस्त्याकडेच्या नाल्यांमधून वाहून नद्यांत येतो.

नद्यांचे रूपांतर प्लास्टिकच्या ‘हायवे’मध्ये होते आणि सर्व प्लास्टिक महासागरात वाहून येते.

समुद्रातील प्लास्टिकचा मोठा अतिरिक्त भाग खराब झालेल्या मासेमारीच्या जाळ्यांमधूनही येतो. काहींना असे वाटेल की, जे देश सर्वाधिक प्लास्टिकचे उत्पादन किंवा वापर करतात तेच महासागरांना सर्वाधिक प्रदूषित करतात, पण ते खरे नाही.

अभ्यासानुसार, लहान भौगोलिक क्षेत्र, लांब किनारपट्टी, जास्त पर्जन्यमान आणि खराब कचरा व्यवस्थापन प्रणाली असलेल्या देशांमध्ये प्लास्टिक समुद्रात येण्याची अधिक शक्यता असते. उदाहरणार्थ, मलेशियाच्या तुलनेत चीन १० पट प्लास्टिक कचरा निर्माण करतो. तथापि, चीनच्या ०.६% च्या तुलनेत मलेशियाच्या एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ९% महासागरात पोहोचतो, असा अंदाज आहे.

थायलंड २२,८०६, बांगलादेश २४,६४०, व्हिएतनाम २८,२२१, ब्राझील ३७,९९९, म्यानमार ४०,०००, इंडोनेशिया ५६,३००, चीन ७०,७०७, मलेशिया ७३,०९८, भारत १,२६,५१३, फिलिपिन्स ३,५६,३७१.