शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

नेपाळमधील राजदूताची हकालपट्टी नाही

By admin | Updated: May 10, 2016 03:15 IST

नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला.

काठमांडू : नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला. ही अफवा असली तरी भारत आणि नेपाळ यांच्यातील आतापर्यंत चांगले असलेले संबंध हळूहळू बिघडत असल्याचे जाणकारांचे मत आहे. नेपाळची नवी राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर मधेशींचे जे आंदोलन झाले, तेव्हापासून संबंधांमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे नेपाळ सरकारने चीनशी संबंध सुधारायला सुरुवात केली आहे आणि व्यापार तसेच देशांतर्गत काही प्रकल्पांबाबत चीनशी काही करार केले आहेत. त्यामुळे भारत सरकारही नेपाळच्या पावलांकडे शंकेने पाहत आहे. त्यातच अशा अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवा ‘निराधार’ व उभय देशांतील द्विपक्षीय संबंध बिघडविण्याच्या हेतूने पसरविण्यात आल्याचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री कमल थापा यांनी म्हटले. नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचा पहिलाच भारत दौरा रद्द होणे आणि नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय यांना सरकार माघारी बोलावून घेणार असल्यामुळे निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या. राय यांना राजदूताचे असलेले संरक्षण काढून घेण्याच्या विचारात नेपाळ सरकार असल्याचे वृत्तात म्हटले होते. पंतप्रधान के. पी. ओली यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी उपाध्याय यांनी भारत सरकारशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांना सरकारने माघारी बोलावले असल्याचे बातम्यांत म्हटले होते. विद्यादेवी भंडारी यांचा भारत दौरा नेपाळ सरकारने ७२ तास आधी रद्द केला; परंतु त्याचे कारण जाहीर केले नाही. नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताच्या हस्तक्षेपावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी भंडारी यांचा दौरा रद्द केल्याचे समजते.