शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तापमान कमी करण्यासाठी तातडीने करार करण्याची गरज

By admin | Updated: December 1, 2015 08:58 IST

जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पॅरिस : जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.संयुक्त राष्ट्रांनी येथे आयोजित केलेल्या जागतिक हवामान बदलावरील परिषदेसाठी भारताच्या पॅव्हेलियनचे उद््घाटन करताना मोदी यांनी जीवनशैलीत बदल केल्यास पृथ्वीवरील ओझे काहीसे कमी होईल, असे म्हटले. वाढलेले तापमान हे मोठे आव्हान आहे हे खरेच; परंतु ते आम्ही निर्माण केलेले नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. या परिषदेचे फलित काय हे खूप महत्त्वाचे आहे. जगाने तातडीने कृती करावी, असे आम्हाला वाटते. आमचे प्रयत्न किती टिकाऊ असतील हे आमचे विचार आणि कृती यावर अवलंबून असेल, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले, भारताचा विकास ही आमची नियती आणि आमच्या लोकांचा हक्क आहे तरीही आम्ही वाढत्या तापमानाशी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. पॅव्हेलियनमधील वेगवेगळ्या स्टॉल्सवर मोदी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह गेले. नंतर त्यांनी पर्यावरण संरक्षणावरील पुस्तकाचे प्रकाशन केले. जागतिक तापमान वाढल्याचा परिणाम हा हवामान बदलात झालेला आहे. तापमान वाढल्याचे वाईट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांची वाढलेली जोखीम, हवामानाच्या पद्धतीमध्ये झालेले बदल आणि नैसर्गिक संकटांची भीषणता, असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. ही परिषद भारताच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. विकसित देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी गरीब देशांना तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. या परिषदेच्या समाप्तीनंतर झालेला करार हा मानव व निसर्ग यांच्यात समतोल राखणारा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‘गरजा भागतील एवढी साधने आहेत; हावरटपणा नको, कोणीही निसर्गाच्या पुढे नाही’मोदी यांनी भाषणात ऋग्वेदातील क्षेत्रपती सुक्त आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा उल्लेख केला. या जगात प्रत्येकाच्या गरजा भागतील एवढी साधने आहेत; परंतु कोणाचाही हावरटपणा त्यातून पूर्ण होणार नाही, असे गांधी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या आवडीनिवडींना त्यांची संस्कृती आणि श्रद्धांमुळे आकार मिळतो. भारतात निसर्गाला आईचा दर्जा आहे. फार पुरातन काळापासून आम्ही मानवता हा निसर्गाचाच भाग असल्याचे व निसर्गाच्या वर नसल्याचे बघितले आहे. निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांत पावित्र्य असल्याचे मोदींनी सांगितले.