शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारत-चीनमधील प्रश्न सुटू शकतो

By admin | Updated: March 4, 2017 04:37 IST

तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो

बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>सर्वोच्च न्यायालयाने १९५६ मध्ये एका प्रकरणात स्पष्ट केले होते की, घटनात्मक दुरुस्तीशिवाय हा भाग दुसऱ्या सरकारच्या स्वाधीन करता येणार नाही.