शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

...तर भारत-चीनमधील प्रश्न सुटू शकतो

By admin | Updated: March 4, 2017 04:37 IST

तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो

बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>सर्वोच्च न्यायालयाने १९५६ मध्ये एका प्रकरणात स्पष्ट केले होते की, घटनात्मक दुरुस्तीशिवाय हा भाग दुसऱ्या सरकारच्या स्वाधीन करता येणार नाही.