शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Qamar Javed Bajwa: १९७१ युद्धाची जखम आजही भळभळती; 'पाकचे सैन्य हरले नाही', बाजवांनी राजकारण्यांना ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:11 IST

भारतीय लष्कराने जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. पण भारतातील लोक लष्करावर क्वचितच टीका करतात, असे म्हणत त्यांनी भारतावर तोंडसुख घेण्याची खुमखुमी शमवून घेतली आहे. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा लवकरच निवृत्त होत आहेत. या प्रसंगी त्यांनी सैन्याला आज अखेरचे संबोधित केले. यावेळी त्यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढ्यावर भाष्य केले. १९७१ ला सैन्य हरले नव्हते तर राजनैतिक अपयशामुळे हार पत्करावी लागल्याचे ते म्हणाले. 

१९७१ च्या युद्धात आपले सैन्य धाडसाने लढले. मला या युद्धाबाबत काही खुलासे करायचे आहेत. जे सांगितले जाते ते दुरुस्त करायचे आहे. पाकिस्तानी लष्कराचे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. पाकिस्तानी लष्कर काहीही करू शकते, पण देशहिताच्या विरोधात काहीही करणार नाही, अशी मर्दुमकी त्यांनी गाजविली. राजकीय पक्ष आणि लोकांना लष्करावर टीका करण्याचा अधिकार आहे पण त्यांनी लष्करावर टीका करण्यासाठी शब्द निवडले पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

ज्यांना असे वाटते की सैन्य आणि जनता यांच्यात तेढ निर्माण होईल, असे काहीही घडणार नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप घटनाबाह्य आहे. अशा स्थितीत लष्कराने भविष्यात कोणत्याही राजकीय प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असा निर्धार केला आहे. आम्ही या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करू, असे आश्वासन बाजवा यांनी पाकिस्तानींना दिले. 

भारतीय लष्कराने जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. पण भारतातील लोक लष्करावर क्वचितच टीका करतात, असे म्हणत त्यांनी भारतावर तोंडसुख घेण्याची खुमखुमी शमवून घेतली आहे. 

जनरल बाजवा (61) तीन वर्षांच्या मुदतवाढीनंतर 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला संरक्षण मंत्रालयाकडून सोमवारी नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात पाच जणांची नावे आहेत. त्यापैकी एकाची जनरल जावेद बाजवा यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवान