शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Qamar Javed Bajwa: १९७१ युद्धाची जखम आजही भळभळती; 'पाकचे सैन्य हरले नाही', बाजवांनी राजकारण्यांना ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:11 IST

भारतीय लष्कराने जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. पण भारतातील लोक लष्करावर क्वचितच टीका करतात, असे म्हणत त्यांनी भारतावर तोंडसुख घेण्याची खुमखुमी शमवून घेतली आहे. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा लवकरच निवृत्त होत आहेत. या प्रसंगी त्यांनी सैन्याला आज अखेरचे संबोधित केले. यावेळी त्यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढ्यावर भाष्य केले. १९७१ ला सैन्य हरले नव्हते तर राजनैतिक अपयशामुळे हार पत्करावी लागल्याचे ते म्हणाले. 

१९७१ च्या युद्धात आपले सैन्य धाडसाने लढले. मला या युद्धाबाबत काही खुलासे करायचे आहेत. जे सांगितले जाते ते दुरुस्त करायचे आहे. पाकिस्तानी लष्कराचे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. पाकिस्तानी लष्कर काहीही करू शकते, पण देशहिताच्या विरोधात काहीही करणार नाही, अशी मर्दुमकी त्यांनी गाजविली. राजकीय पक्ष आणि लोकांना लष्करावर टीका करण्याचा अधिकार आहे पण त्यांनी लष्करावर टीका करण्यासाठी शब्द निवडले पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

ज्यांना असे वाटते की सैन्य आणि जनता यांच्यात तेढ निर्माण होईल, असे काहीही घडणार नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप घटनाबाह्य आहे. अशा स्थितीत लष्कराने भविष्यात कोणत्याही राजकीय प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असा निर्धार केला आहे. आम्ही या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करू, असे आश्वासन बाजवा यांनी पाकिस्तानींना दिले. 

भारतीय लष्कराने जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. पण भारतातील लोक लष्करावर क्वचितच टीका करतात, असे म्हणत त्यांनी भारतावर तोंडसुख घेण्याची खुमखुमी शमवून घेतली आहे. 

जनरल बाजवा (61) तीन वर्षांच्या मुदतवाढीनंतर 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला संरक्षण मंत्रालयाकडून सोमवारी नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात पाच जणांची नावे आहेत. त्यापैकी एकाची जनरल जावेद बाजवा यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवान