शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

...तर दोन दिवसांत उद्ध्वस्त होणार अर्थव्यवस्था, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेने दिला अखेरचा निर्वाणीचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:03 IST

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे.

कोलंबो - आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर दोन दिवसांच्या आत नव्या सरकारची नियुक्ती झाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

वीरसिंधे यांनी सांगितले की, कुणीही अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सक्षम नसेल. राजकीय स्थैर्य निर्माण झाले पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वप्रथम गरज ही नव्या सरकारची आहे. दरम्यान, श्रीलंकेतील वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीदरम्यान, श्रीलंकेमध्ये विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा हे नवे पंतप्रधान बनतील, अशी चर्चा आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, जेव्हा राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा देतील तेव्हाच साजिथ प्रेमदासा हे आपल्या हातात देशाची सत्ता घेतील असे सांगण्यात येत आहे. गोटबाया हे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. महिंदा राजपक्षे यांनी समर्थकांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राजीनामा दिला होता.

श्रीलंकेमध्ये उसळलेल्या दंगतील आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. देशात आणीबाणी लागू झाली आहे. महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीलंकेवर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. श्रीलंकन रुपयाची किंमत सातत्याने कोसळत आहे. मार्चमध्ये एक डॉलरची किंमत २०१ श्रीलंकन रुपये होत होती. ती आता ३६० श्रीलंकन रुपयांपर्यंत वाढली आहे. श्रीलंकेत महागाईचा दर हा १७ टक्क्यांचा आकडा पार करून पुढे पोहोचला आहे. दूध, तांदूळ आणि तेलासारख्या जीवनाश्यक वस्तूंसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था