शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

...तर दोन दिवसांत उद्ध्वस्त होणार अर्थव्यवस्था, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेने दिला अखेरचा निर्वाणीचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:03 IST

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे.

कोलंबो - आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर दोन दिवसांच्या आत नव्या सरकारची नियुक्ती झाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

वीरसिंधे यांनी सांगितले की, कुणीही अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सक्षम नसेल. राजकीय स्थैर्य निर्माण झाले पाहिजे. त्यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वप्रथम गरज ही नव्या सरकारची आहे. दरम्यान, श्रीलंकेतील वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीदरम्यान, श्रीलंकेमध्ये विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा हे नवे पंतप्रधान बनतील, अशी चर्चा आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, जेव्हा राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा देतील तेव्हाच साजिथ प्रेमदासा हे आपल्या हातात देशाची सत्ता घेतील असे सांगण्यात येत आहे. गोटबाया हे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. महिंदा राजपक्षे यांनी समर्थकांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राजीनामा दिला होता.

श्रीलंकेमध्ये उसळलेल्या दंगतील आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. देशात आणीबाणी लागू झाली आहे. महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीलंकेवर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. श्रीलंकन रुपयाची किंमत सातत्याने कोसळत आहे. मार्चमध्ये एक डॉलरची किंमत २०१ श्रीलंकन रुपये होत होती. ती आता ३६० श्रीलंकन रुपयांपर्यंत वाढली आहे. श्रीलंकेत महागाईचा दर हा १७ टक्क्यांचा आकडा पार करून पुढे पोहोचला आहे. दूध, तांदूळ आणि तेलासारख्या जीवनाश्यक वस्तूंसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था