शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:13 IST

अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करत थायलँड आणि कंबोडिया दोन्हीही देश सीजफायर चर्चा करण्यासाठी तयार झालेत असं सांगितले.

२८ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून थायलँड आणि कंबोडिया यांच्यात गोळीबार सुरू झाला. १० मिनिटांच्या या चकमकीत कंबोडियन सैन्याचे लेफ्टिनंट सुओन रौन यांचा मृत्यू झाला. या दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर थायलँड आणि कंबोडिया यांच्यात सीमेवर अधिक सैन्य दल तैनात करण्यात आले. हा तणाव शांत करण्यासाठी थायलँडच्या पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनवात्रा यांनी १५ जूनला कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. 

या दोन्ही नेत्यांमध्ये १७ मिनिटे संवाद झाला. जो काही दिवसांनी लीक झाला आणि त्यामुळे थायलँडच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला. शिनवात्रा यांना अवघ्या १५ दिवसांत त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर २४ जुलैला पुन्हा थायलँड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत या संघर्षात ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. २ लाखाहून अधिक लोकांनी या संघर्षातून पलायन केले आहे. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करत थायलँड आणि कंबोडिया दोन्हीही देश सीजफायर चर्चा करण्यासाठी तयार झालेत असं सांगितले.

शिवमंदिरावरून बौद्ध देशांमध्ये संघर्ष वाढला

थायलँड पंतप्रधान यांचे देशात काही चालत नाही, सैन्य त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही असं हुन सेन आणि कंबोडियन सरकार म्हणत आहे. त्यातच कंबोडियाने सीमावर्ती भागात गस्त वाढवली आहे. आपली प्रतिष्ठा आणि बॉर्डरवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते थायलँडच्या सैन्याला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात २४ जून रोजी थायलँड आणि कंबोडिया सीमेवर बनलेल्या ९०० वर्ष जुन्या शिव मंदिराजवळ दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळला. हे दोन्ही देश या मंदिरावर स्वत:चा हक्क सांगतात. हे मंदिर थायलँड त्यांच्या नकाशात दाखवते परंतु कंबोडिया ते आपले असल्याचा दावा करते. 

थायलँड सैनिकांनी गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मंदिराच्या चहुबाजूने काटेरी तारा लावल्या. त्यानंतर ७ वाजता एक ड्रोन उडवले आणि ८.३० च्या सुमारास फायरिंग सुरू केली असा आरोप कंबोडियाचा आहे. कंबोडिया आणि थायलँड यांच्या युद्धात ३३ जणांचा जीव गेला आहे तर १०० हून अधिक जखमी आहेत. UN सुरक्षा परिषदेत या युद्धाबाबत तातडीने बैठक घेण्यात आली परंतु आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. 

टॅग्स :Thailandथायलंड