शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी 

By sagar.sirsat | Updated: August 4, 2017 07:10 IST

पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केला अर्ज

ठळक मुद्देराजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून  ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ या नावाने राजकीय पक्ष पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहेराजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ओळखून  सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची हाफिज सईदची योजनाराजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तानात आपले पाय आणखी घट्ट रोवण्याचा त्याचा विचार

इस्लामाबाद, दि. 4 - पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पाकिस्तानात नजरकैदेत आहे. राजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून  ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ या नावाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्याने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सईद पाकिस्तानात नजरकैदेत आहे. या दरम्यान पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पनामा प्रकरणात दोषी आढळल्याने शरीफ यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाली आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्षातील  तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचा आरोप ठेवत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. 

 त्यामुळे राजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ओळखून  सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची हाफिज सईदची योजना आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआय सोबतही सईदचे संबंध चांगले आहेत. याचा फायदा उचलण्याचा हाफिज सईदचा विचार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यास या दहशतवाद्याचा राजकारणात उतरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तानात आपले पाय आणखी घट्ट रोवण्याचा त्याचा विचार आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे. 

हाफिज सईद गेल्या 6 महिन्यांपासून नजरकैदेत आहे. जमात-उद-दावावर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील असा इशारा अमेरिकेने दिल्यानंतर हाफिजला नजरकैदेत ठेवण्यात आले. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची भारत सातत्याने मागणी करत आहे.