शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

अतिरेक्यांचा खातमा

By admin | Updated: July 3, 2016 04:32 IST

बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले

ढाका : बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले आणि एका दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या २० परदेशी नागरिक ठार झाले होते. त्यात १८ वर्षांच्या तरुषी जैन या भारतीय मुलीचा समावेश आहे. जखमींमध्येही एक भारतीय डॉक्टर आहे. दहशतवाद्यांनी काल गोळीबार करीत सर्व ग्राहकांना ओलीस धरले होते. ओलिसांमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक आणि विविध देशांच्या दुतावासांतील अधिकारी होते. या सर्व ओलिसांची पोलीस व सशस्त्र दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी सुटका केली. त्यासाठी आज सकाळी पोलीस, सशस्त्र जवान आणि कमांडो यांनी एकत्र मिळून मोहीम हाती घेतली. त्यावेळी मोठी धुमश्चक्री झाली. तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. या काळात किमान १00 स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्याचे हजारांहून अधिक आवाज ऐकू आले. या मोहिमेत सहा अतिरेकी ठार झाले, तर एकाला जिवंत ताब्यात घेण्यात यश आले. दोन पोलीस अधिकारीही मरण पावले. अतिरेक्यांच्या गोळीबारात किमान ४0 जण जखमी झाले असून, त्यात एका भारतीय डॉक्टराचा समावेश आहे. बांगलादेशात गेल्या काही काळापासून इसिस व अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू असून, हा हल्ला त्याचाच भाग होता. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर तसेच बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दक्षतेचा भाग म्हणून सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश आहेत. इसिसचे अतिरेकी सीमेपाशी येऊन ठेपल्यामुळे सीमा सुरक्षा दलांनी दोन्ही देशांच्या सीमेवर जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. (वृत्तसंस्था)तरुषी सुट्टीसाठी ढाक्यातअमेरिकेत शिकत असलेली तरुषी इंटर्नशिपसाठी बांगलादेशात आली होती. जैन कुंटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असून तिचे वडील संजिव जैन यांचा ढाका येथे कपड्यांचा व्यवसाय आहे. हल्ल्यामध्ये ओलीस ठेवलेल्यांत तरुषी होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केल्याचे सांगताना मला अतीव दु:ख होत आहे, असे टष्ट्वीट परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.भारताला दु:ख : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दूरध्वनी करून ढाक्यातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत संकटाच्या या काळात बांगलादेशसोबत ठामपणे उभा असल्याचे यावेळी ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.भारताचे बारीक लक्ष : ओलीस संकटावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश सुरक्षा दलाने ओलीस नाट्य संपविण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्यामुळे भारत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.