शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 09:02 IST

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

इस्लामाबाद : जर सीमेपलीकडील हालचाली दहशतवाद, अतिरेकवाद व फुटीरतावाद या तीन वाईट कृत्यांवर आधारित असतील तर व्यापार, ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता धूसर होते, असे नमूद करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर  पाकला खडेबोल सुनावले. 

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

कुठलेही सहकार्य हे परस्पर आदर व सार्वभौमत्वाच्या समानतेवर आधारित असले पाहिजे. एससीओच्या प्रत्येक सदस्य राष्ट्राने समूहाच्या प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. शांघाय सहकार्य संघटनेची(एससीओ) व्याप्ती वाढण्याची गरज पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.   

परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असावेत- परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असण्याच्या भावनेला बळकटी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.- क्षेत्रीय सहकार्यावर बोलताना दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकची चांगलीच कानउघडणी केली.- पाकला खडेबोल सुनावतानाच पूर्व लडाखमधील भारत व  चीनच्या लष्करामधील तणाव, हिंद महासागर व इतर धोरणात्मक जलक्षेत्रात चीनच्या वाढत्या शक्तीचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली.- या शिखर संमेलनाचे अध्यक्ष व पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे उद्घाटनाचे भाषण झाल्यानंतर लगेच जयशंकर यांनी संबोधित केले. 

चीनच्या योजनेला भारताचा विरोधचचीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या योजनेला पाठिंबा देण्यास भारताने पुन्हा एकदा नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेला पाठिंबा न देणारा भारत हा एससीओमधील एकमेव देश ठरला आहे. 

ओबीओआर ही योजना चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ओबीओआरचा मार्ग जाणार आहे. या गोष्टी व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारताने या योजनेला बुधवारी विरोध केला..

एससीओचा उद्देश...संतुलित विकास, एकात्मता व संघर्ष रोखण्यासाठी सकारात्मक शक्ती बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रादेशिक स्वरूपाचे बहुआयामी सहकार्य विकसित करणे, हादेखील संघटनेचा उद्देश आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान