शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:06 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : अनेकांची आयुष्ये झाली उद््ध्वस्त, विविध प्रदेशांत अस्थैर्य

अबु धाबी : दहशतवादामुळे अनेकांची आयुष्ये उद््ध्वस्त होत असून त्यामुळे विविध प्रदेशांत अस्थैर्य निर्माण झाले आहे. या गोष्टींमुळे जग संकटाच्या खाईत लोटले जात आहे असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) ही ५७ मुस्लीम देशांची संघटना असून त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद््घाटन सोहळ््याला प्रमुख पाहुणा म्हणून भारताला प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सुषमा स्वराज यांनी आपल्या सतरा मिनिटांच्या भाषणात सांगितले की, दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही.

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज म्हणाल्या की, मुलतत्ववादी व धर्मांध विचारसरणीला भारतातले खूपच कमी मुस्लीम बांधव बळी पडतात. विविध गोष्टींच्या नावाखाली दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. या घातपाती कारवाया जिथे होतात त्या प्रदेशाचेच अंतिमत: मोठे नुकसान होत असते. (वृत्तसंस्था)पाकिस्तानचा बहिष्कारभारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ले चढविले होते. या कृतीच्या निषेधार्थ भारताला ओआयसीच्या परिषदेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करावे अशी मागणी पाकिस्तानने आयोजकांकडे केली होती. पण त्याकडे कोणीही ढुंकून न पाहिल्याने पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात त्या देशाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, भारताला आमंत्रित करण्याबाबत ओआयसीने पाकिस्तानशी सल्लामसलत केली नव्हती. भारत या संघटनेचा सदस्य किंवा निरीक्षकही नाही तरीही का बोलाविण्यात आले?

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज