शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:06 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : अनेकांची आयुष्ये झाली उद््ध्वस्त, विविध प्रदेशांत अस्थैर्य

अबु धाबी : दहशतवादामुळे अनेकांची आयुष्ये उद््ध्वस्त होत असून त्यामुळे विविध प्रदेशांत अस्थैर्य निर्माण झाले आहे. या गोष्टींमुळे जग संकटाच्या खाईत लोटले जात आहे असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) ही ५७ मुस्लीम देशांची संघटना असून त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद््घाटन सोहळ््याला प्रमुख पाहुणा म्हणून भारताला प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सुषमा स्वराज यांनी आपल्या सतरा मिनिटांच्या भाषणात सांगितले की, दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही.

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज म्हणाल्या की, मुलतत्ववादी व धर्मांध विचारसरणीला भारतातले खूपच कमी मुस्लीम बांधव बळी पडतात. विविध गोष्टींच्या नावाखाली दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. या घातपाती कारवाया जिथे होतात त्या प्रदेशाचेच अंतिमत: मोठे नुकसान होत असते. (वृत्तसंस्था)पाकिस्तानचा बहिष्कारभारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ले चढविले होते. या कृतीच्या निषेधार्थ भारताला ओआयसीच्या परिषदेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करावे अशी मागणी पाकिस्तानने आयोजकांकडे केली होती. पण त्याकडे कोणीही ढुंकून न पाहिल्याने पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात त्या देशाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, भारताला आमंत्रित करण्याबाबत ओआयसीने पाकिस्तानशी सल्लामसलत केली नव्हती. भारत या संघटनेचा सदस्य किंवा निरीक्षकही नाही तरीही का बोलाविण्यात आले?

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज