शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

भुकंपानंतर १२० तासांनी किशोरवयीन मुलाची झाली सुटका

By admin | Updated: May 1, 2015 01:53 IST

नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली

काठमांडू : नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली असून, १२० तास ढिगाऱ्याखालील किशोरवयीन मुलाची सुखरूप सुटका हा एक चमत्कारच मानावा लागेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येण्याचीच ही वेळ. काठमांडू शहरात गुरुवारी असाच चमत्कार घडला. १५ वर्षांच्या मुलाला पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी ३० वर्षीय महिलेचीही बचावदलाने सुटका केली.पेम्बा लामा असे या मुलाचे नाव आहे. शनिवारचा भीषण भूकंप झाला तेव्हाच कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला; पण इमारतीचे दोन खांब एकमेकांवर पडले व मधल्या पोकळीत पेमा लांबा असल्याने त्याच्यासाठी हवेची पोकळी तयार झाली. त्याच्या रडण्याचा अगदी मंद असा आवाज कानावर पडल्यानंतर अमेरिकन व नेपाळी पथकाने त्याची सुटका केली. पेम्बाची सुटका होताच घटनास्थळी जमलेल्या मोठ्या जमावात आनंदाची लहर फिरली. सात मजली गेस्ट हाऊसच्या ढिगाऱ्याखालून पाच दिवसांनी हा मुलगा जिवंत बाहेर पडला.या घटनेने नेपाळमधील भूकंपपीडितांच्या मनात एक आशेचा किरण फुलला.पाकने पाठविला बीफ मसाला४काठमांडू : नेपाळमधील भूकंपानंतर, तेथील हजारो लोक भुकेले असून, अन्नाची वाट पाहत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी पाकिस्ताननेही दोन विमाने पाठविली; पण त्यातून आलेल्या अन्नपपदार्थात बीफ मसाल्याची पाकिटे असल्याने धक्का बसलेल्या लोकांनी या पाकिटांना स्पर्शही केला नाही. भारताप्रमाणेच नेपाळमध्ये गाय पवित्र समजली जाते. ४गाईस मारण्यास तिथे बंदी असून, या गुन्ह्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे. नेपाळमध्ये बीफ मसाला पाठविणे ही काही जणांच्या मते असंवेदनशीलता तर काही जणांच्या मते पाकने केलेली ही क्रूर थट्टा आहे. ‘डेली मेल’मध्ये आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या मदतीतील अन्नाची पाकिटे कशाची आहेत हे प्रथम भारतीय डॉक्टरांनी पाहिले व नंतर अधिकाऱ्यांना सांगितले.दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका४नवी दिल्ली : नेपाळमधील भीषण भूकंपानंतर नेपाळ-भारत सीमा दहशतवाद्यांसाठी धोकादायक झाली असून, भूकंपबळींच्या वेशात दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारत- नेपाळ सीमेवर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्याचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने अनेक दहशतवादी संघटना आपले सदस्य भारतात घुसविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ४हा धोका लक्षात घेऊन गुप्तचर संघटना आयबीने एक निवेदन प्रसिद्ध केले असून उत्तर प्रदेश सरकारला अलर्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर असणाऱ्या महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहारिच, लखीमपूर खेरी व पिलिभीत या शहरांच्या सीमेवर गस्त वाढवावी असे आयबीने या निवेदनात म्हटले आहे.४नेपाळमधील भूकंपबळींची संख्या १५ हजारांवर जाण्याची भीती नेपाळच्या सैन्यप्रमुखांनी गुरुवारी व्यक्त केली. आतापर्यंत सुमारे ६,००० हजार मृतदेह सापडले असून, ११ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. अद्याप अनेक भागांत मदत आणि बचाव पथके पोहोचायची आहेत.४नेपाळचे सैन्यप्रमुख जनरल गौरव राणा यांनी सांगितले की, आमच्या अंदाजानुसार भूकंपबळींची संख्या १० ते १५ हजारांदरम्यान राहील. मदत न पोहोचल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याची आम्हाला जाणीव असून भूकंपोत्तर आजारांचा प्रादुर्भाव रोखणे हा आमच्या अजेंड्यावरील मुख्य मुद्दा आहे. तत्पूर्वी, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी भूकंपबळींची संख्या १० हजारांवर जाण्याची भीती व्यक्त केली होती.