शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

श्रीलंका-चीनमधल्या डीलमुळे भारताची वाढली डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:07 IST

रणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे.

ठळक मुद्देरणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे.श्रीलंकेने हंबनटोटा बंदराचे 70 टक्के मालकी हक्क चीनच्या एका कंपनीला दिले आहेत.

कोलंबो, दि. 29 - रणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे. भारतासाठी निश्चितच ही चांगली बातमी नाही. 72 अब्ज रुपयांच्या या करारातंर्गत श्रीलंकेने हंबनटोटा बंदराचे 70 टक्के मालकी हक्क चीनच्या एका कंपनीला दिले आहेत. हा करार उद्या भारतासाठी डोकेदुखी बनू शकतो. श्रीलंका पोर्ट ऑथोरिटी आणि चायन मर्चेंट्स पोर्ट होल्डिंग्समध्य झालेल्या या करारानुसार चिनी कंपनीला या बंदरावर मोठा मालकी हक्क मिळाला आहे. 

हे बंदर उभारण्यासाठी श्रीलंकेने चीनकडून मोठया प्रमाणावर कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी या बंदराचे मालकी हक्क विकावे लागले आहेत. या करारात भारतासाठी समाधानाची बाब एवढीच आहे की, या बंदराच्या सुरक्षेची जबाबदारी श्रीलंकन नौदलावरच असेल. याआधी चीन या बंदराजळ आपला नौदल तळ उभा करणार असल्याची चर्चा होती. श्रीलंकेचे बंदरविकास मंत्री महिंदा समरसिंघे म्हणाले की, इथे कुठल्याही परदेशी नौदलाला तळ बांधू दिला जाणार नाही. 

या करारामुळे भारतासमोर जी रणनितीक आव्हाने निर्माण होणार आहेत ते लक्षात घेऊन समरसिंघे यांनी हे विधान केले आहे. भारताचा दक्षिण किनारपट्टीचा भाग समुद्रमार्गे श्रीलंकेशी जोडलेला आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने हा एक चांगला करार आहे. यामुळे आमच्यावरील कर्ज कमी होईल. 70 टक्के इक्विटी ट्रांसफरमधून जो पैसा मिळले त्यातून चीनचे कर्ज फेडू. श्रीलंकेने 99 वर्षांच्या भाडेतत्वावर सीएमपोर्ट या चिनी कंपनीला शेअर्स दिले आहेत. मंगळवारी श्रीलंकन कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहा महिन्यांपूर्वीच या कराराची रचना तयार झाली होती. 

चीनला व्यापारीक आणि रणनितीक फायद्याच्या दृष्टीकोनातून आपल्या समुद्रापासून इराणपर्यंत बंदराची साखळी उभी करण्याची योजना आहे. चीनचे सध्या सागरी आणि जमिनीच्या हद्दीवरुन शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहेत. डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे.