शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

श्रीलंका-चीनमधल्या डीलमुळे भारताची वाढली डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:07 IST

रणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे.

ठळक मुद्देरणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे.श्रीलंकेने हंबनटोटा बंदराचे 70 टक्के मालकी हक्क चीनच्या एका कंपनीला दिले आहेत.

कोलंबो, दि. 29 - रणनितीक दुष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या हंबनटोटा बंदरासंबंधी चीन आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आहे. भारतासाठी निश्चितच ही चांगली बातमी नाही. 72 अब्ज रुपयांच्या या करारातंर्गत श्रीलंकेने हंबनटोटा बंदराचे 70 टक्के मालकी हक्क चीनच्या एका कंपनीला दिले आहेत. हा करार उद्या भारतासाठी डोकेदुखी बनू शकतो. श्रीलंका पोर्ट ऑथोरिटी आणि चायन मर्चेंट्स पोर्ट होल्डिंग्समध्य झालेल्या या करारानुसार चिनी कंपनीला या बंदरावर मोठा मालकी हक्क मिळाला आहे. 

हे बंदर उभारण्यासाठी श्रीलंकेने चीनकडून मोठया प्रमाणावर कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी या बंदराचे मालकी हक्क विकावे लागले आहेत. या करारात भारतासाठी समाधानाची बाब एवढीच आहे की, या बंदराच्या सुरक्षेची जबाबदारी श्रीलंकन नौदलावरच असेल. याआधी चीन या बंदराजळ आपला नौदल तळ उभा करणार असल्याची चर्चा होती. श्रीलंकेचे बंदरविकास मंत्री महिंदा समरसिंघे म्हणाले की, इथे कुठल्याही परदेशी नौदलाला तळ बांधू दिला जाणार नाही. 

या करारामुळे भारतासमोर जी रणनितीक आव्हाने निर्माण होणार आहेत ते लक्षात घेऊन समरसिंघे यांनी हे विधान केले आहे. भारताचा दक्षिण किनारपट्टीचा भाग समुद्रमार्गे श्रीलंकेशी जोडलेला आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने हा एक चांगला करार आहे. यामुळे आमच्यावरील कर्ज कमी होईल. 70 टक्के इक्विटी ट्रांसफरमधून जो पैसा मिळले त्यातून चीनचे कर्ज फेडू. श्रीलंकेने 99 वर्षांच्या भाडेतत्वावर सीएमपोर्ट या चिनी कंपनीला शेअर्स दिले आहेत. मंगळवारी श्रीलंकन कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहा महिन्यांपूर्वीच या कराराची रचना तयार झाली होती. 

चीनला व्यापारीक आणि रणनितीक फायद्याच्या दृष्टीकोनातून आपल्या समुद्रापासून इराणपर्यंत बंदराची साखळी उभी करण्याची योजना आहे. चीनचे सध्या सागरी आणि जमिनीच्या हद्दीवरुन शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहेत. डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे.