शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

श्रीलंकेने काढले २०० जणांना देशाबाहेर, अनेक भागांत अटकसत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:16 IST

१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

कोलंबो  - १५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अभयवर्धने यांना सांगितले की, या आत्मघाती हल्ल्यांनंतर आम्ही व्हिसाचे नियम कडक करून त्यांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून कायदेशीरपणे देशात आलेल्या; परंतु व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य करीत असलेल्या ६०० हून अधिक विदेशी नागरिकांना तात्काळ देशाबाहेर काढण्यात आले आहे. यात विविध देशांतून आलेल्या सुमारे २०० इस्लामी धर्मगुरूंचाही समावेश आहे. गृहमंत्र्यांनी हे लोक कोणत्या देशांचे होते हे सांगितले नाही. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार त्यात बांगलादेश, भारत, मालदीव आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.अभयवर्धने म्हणाले की, श्रीलंकेत सर्वच धर्माच्या धार्मिक संस्था त्यांच्या येथे धार्मिक प्रवचने देण्यासाठी गेली अनेक वर्षे परदेशी धर्मगुरूंना बोलावत असतात. त्यांनी यायला आमची काही हरकत नाही; पण हल्ली ते प्रमाण जरा जास्तच वाढल्याचे दिसत होते. ईस्टरच्या बॉम्बहल्ल्यांनंतर आम्ही अशा मंडळींच्या वास्तव्याकडे जरा अधिक बारकाईने लक्ष देत आहोत.या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली असून, लष्कर व पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ते वापरून देशाच्या अनेक भागांत अजूनही धाड व अटकसत्र सुरू आहे.अजूनही धोका पूर्ण टळला नसल्याने ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या घरात बसूनच प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)शाळा पुन्हा सुरू होणारखबरदारीचा उपाय म्हणून गेले दोन आठवडे बंद राहिलेल्या श्रीलंकेतील शाळा सोमवारपासून कडक बंदोबस्तात पुन्हा सुरू होणार आहेत. माध्यमिक शाळा ६ मेपासून, तर प्राथमिक शाळा १३ मेपासून सुरू होतील. प्रत्येक शाळेत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :sri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोट