शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Sri Lanka Crisis: अवघ्या श्रीलंकेला खाईत लोटले तरी खूर्ची सोडवेना; राजपक्षे सरकार कोसळण्याच्या अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:21 IST

Gotabaya Rajapaksa, Sri Lanka Crisis: राजपक्षे घराण्याने श्रीलंकेची पुरती वाताहात केली आहे. अशातच लोकांच्या घरांना लागलेली महागाईची आग आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. बाहेर उग्र निदर्शने होत आहेत.

श्रीलंकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जनता संतापलेली असताना राजपक्षे कुटुंबीय देश सोडून पळून गेले आहेत. अशातच आता राजपक्षे सरकारची ४० हून अधिक खासदारांनी साथ सोडल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. आता गळ्यापर्यंत पाणी आले तरी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. 

राजपक्षे घराण्याने श्रीलंकेची पुरती वाताहात केली आहे. अशातच लोकांच्या घरांना लागलेली महागाईची आग आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. बाहेर उग्र निदर्शने होत आहेत. देशाचे ७० टक्के आर्थिक व्यवहार हे राजपक्षे कुटुंबाने आपल्या ताब्यात ठेवले होते. पैसे कुठे कसे खर्च करायचे हा निर्णय संसद नाही तर राजपक्षे कुटुंब घेत होते. या कुटुंबातील ७ जण सत्तेत हात धुवून घेत होते. यामुळे जनतेत मोठा रोष सुरु झाला आहे. 

अशातच आणीबाणी लागू झाल्याने जनतेचे आणखी हाल सुरु झाले आहेत. विरोधकांनी संसदेत राजपक्षे सरकारविरोधात मतदान घेण्याची मागणी केली आहे. जनतेचा राग थंड करण्यासाठी राजपक्षेंनी मध्यरात्रीच मंत्रिमंडळाला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. नवे चेहरे दिल्यास जनतेचा संताप कमी होईल असे त्यांना वाटत असतानाच माजी मंत्री विमल वीरावंसा यांनी १७ खासदारांचा वेगळा गट निर्माण करून सरकारपासून दूर राहण्याच्या निर्णय घेतला आहे. याचबरोबर श्रीलंका पोडूजाना पेरामूना पक्षाने आणखी १२ खासदारांचा वेगळा गट झाल्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्रपती मैत्रीपाल श्रीसेना यांनी देखील १६ खासदारांचा वेगळा गट बनविल्याची घोषणा केली आहे. या साऱ्या घडामोडींवर गोटाबाया यांनी मी राजीनामा देणार नाही, परंतू जो कोणी संसदेत ११३ जागांचे बहुमत दाखवेल त्याला सरकार सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. 

अशाप्रकारे ४० हून सहकारी पक्षांनी सत्ताधारी राजपक्षेंची साथ सोडली आहे. नाराज खासदार उदय गमनपिला यांनी सोमवारी सांगितले की, सरकारच्या अर्थसंकल्पावरील मतदानादरम्यान युतीला 225 पैकी 157 खासदारांचा पाठिंबा होता, परंतु आता 50-60 सदस्य पाठिंबा काढून घेणार आहेत. याचा परिणाम म्हणून सरकार केवळ दोन तृतीयांश बहुमत गमावणार नाही तर 113 इतके साधे बहुमतही गमावेल.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका