शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

Sri Lanka Crisis: अवघ्या श्रीलंकेला खाईत लोटले तरी खूर्ची सोडवेना; राजपक्षे सरकार कोसळण्याच्या अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:21 IST

Gotabaya Rajapaksa, Sri Lanka Crisis: राजपक्षे घराण्याने श्रीलंकेची पुरती वाताहात केली आहे. अशातच लोकांच्या घरांना लागलेली महागाईची आग आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. बाहेर उग्र निदर्शने होत आहेत.

श्रीलंकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जनता संतापलेली असताना राजपक्षे कुटुंबीय देश सोडून पळून गेले आहेत. अशातच आता राजपक्षे सरकारची ४० हून अधिक खासदारांनी साथ सोडल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. आता गळ्यापर्यंत पाणी आले तरी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. 

राजपक्षे घराण्याने श्रीलंकेची पुरती वाताहात केली आहे. अशातच लोकांच्या घरांना लागलेली महागाईची आग आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. बाहेर उग्र निदर्शने होत आहेत. देशाचे ७० टक्के आर्थिक व्यवहार हे राजपक्षे कुटुंबाने आपल्या ताब्यात ठेवले होते. पैसे कुठे कसे खर्च करायचे हा निर्णय संसद नाही तर राजपक्षे कुटुंब घेत होते. या कुटुंबातील ७ जण सत्तेत हात धुवून घेत होते. यामुळे जनतेत मोठा रोष सुरु झाला आहे. 

अशातच आणीबाणी लागू झाल्याने जनतेचे आणखी हाल सुरु झाले आहेत. विरोधकांनी संसदेत राजपक्षे सरकारविरोधात मतदान घेण्याची मागणी केली आहे. जनतेचा राग थंड करण्यासाठी राजपक्षेंनी मध्यरात्रीच मंत्रिमंडळाला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. नवे चेहरे दिल्यास जनतेचा संताप कमी होईल असे त्यांना वाटत असतानाच माजी मंत्री विमल वीरावंसा यांनी १७ खासदारांचा वेगळा गट निर्माण करून सरकारपासून दूर राहण्याच्या निर्णय घेतला आहे. याचबरोबर श्रीलंका पोडूजाना पेरामूना पक्षाने आणखी १२ खासदारांचा वेगळा गट झाल्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्रपती मैत्रीपाल श्रीसेना यांनी देखील १६ खासदारांचा वेगळा गट बनविल्याची घोषणा केली आहे. या साऱ्या घडामोडींवर गोटाबाया यांनी मी राजीनामा देणार नाही, परंतू जो कोणी संसदेत ११३ जागांचे बहुमत दाखवेल त्याला सरकार सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. 

अशाप्रकारे ४० हून सहकारी पक्षांनी सत्ताधारी राजपक्षेंची साथ सोडली आहे. नाराज खासदार उदय गमनपिला यांनी सोमवारी सांगितले की, सरकारच्या अर्थसंकल्पावरील मतदानादरम्यान युतीला 225 पैकी 157 खासदारांचा पाठिंबा होता, परंतु आता 50-60 सदस्य पाठिंबा काढून घेणार आहेत. याचा परिणाम म्हणून सरकार केवळ दोन तृतीयांश बहुमत गमावणार नाही तर 113 इतके साधे बहुमतही गमावेल.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका