शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रीलंका संकटात! तेल, गॅस, अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा; भुकेने व्याकूळ लोक म्हणतात 'मृत्यू हाच पर्याय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:17 IST

Sri Lanka Crisis : लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे.

श्रीलंकेतील आर्थिक आणि अन्न संकटामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे. याच दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पुढील प्लांटिंग सेशनसाठी पुरेसे खत खरेदी करेल.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केमिकल आणि खत उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. सरकारला इतर देशांतून खाण्यापिण्याच्या वस्तुंची आयात करावी लागली आणि त्यामुळे महागाई वाढली.

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट केलं की, "मे आणि ऑगस्टच्या सीझनसाठी खत मिळू शकत नाही परंतु सप्टेंबर आणि मार्च सीझनसाठी खताची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत". पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आणि स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोलंबोमध्ये फळे विकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "दोन महिन्यांत देशातील परिस्थिती कशी झाली हे माहीत नाही." 

"देशात एका सिलिंडरची किंमत 5000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर एप्रिलमध्ये हा भाव 2675 रुपये होता. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केवळ 200 सिलिंडरची डिलिव्हरी झाली. गॅस आणि अन्नाशिवाय आपण कसे जगू? शेवटी आपल्यापुढे एकच पर्याय असेल की आपण उपाशी मरू." श्रीलंकेत सध्या परकीय चलन, तेल, खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका