शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

श्रीलंका संकटात! तेल, गॅस, अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा; भुकेने व्याकूळ लोक म्हणतात 'मृत्यू हाच पर्याय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:17 IST

Sri Lanka Crisis : लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे.

श्रीलंकेतील आर्थिक आणि अन्न संकटामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लोकांना एलपीजी गॅस आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ मिळत नसल्याची स्थिती आहे. याच दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पुढील प्लांटिंग सेशनसाठी पुरेसे खत खरेदी करेल.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केमिकल आणि खत उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. सरकारला इतर देशांतून खाण्यापिण्याच्या वस्तुंची आयात करावी लागली आणि त्यामुळे महागाई वाढली.

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट केलं की, "मे आणि ऑगस्टच्या सीझनसाठी खत मिळू शकत नाही परंतु सप्टेंबर आणि मार्च सीझनसाठी खताची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत". पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आणि स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोलंबोमध्ये फळे विकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "दोन महिन्यांत देशातील परिस्थिती कशी झाली हे माहीत नाही." 

"देशात एका सिलिंडरची किंमत 5000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर एप्रिलमध्ये हा भाव 2675 रुपये होता. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केवळ 200 सिलिंडरची डिलिव्हरी झाली. गॅस आणि अन्नाशिवाय आपण कसे जगू? शेवटी आपल्यापुढे एकच पर्याय असेल की आपण उपाशी मरू." श्रीलंकेत सध्या परकीय चलन, तेल, खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका