शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

By admin | Updated: December 15, 2015 02:55 IST

सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय

रेलिघ (उत्तर कॅरोलिना) : सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय कारणावरून अमेरिकेसारख्या प्रगत देशातील एका शहराने त्यांच्या येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास नकार दिला आहे.उत्तर कॅरोलिना राज्याच्या वूडलॅण्ड शहरातून २५८क्रमांकाचा महामार्ग जातो. या महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव एका खासगी कंपनीने नगरपालिकेकडे दिला होता. येथून जवळच विद्युत उपकेंद्र असल्याने तयार होणारी वीज ग्रीडलाही देणे सोपे होईल म्हणून कंपनीने या ठिकाणाची निवड केली होती.स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या या प्रस्तावावर वूडलॅण्ड नगरपालिकेच्या सभेत झालेल्या चर्चेत सदस्यांनी भीती व शंका उपस्थित केल्याने सौर ऊर्जा प्रकल्प न उभारू देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.नगरपालिकेच्या बैठकीत बॉबी मॅन नामक सदस्याने सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व सूर्यप्रकाशच संपला की शहरात कोणी उद्योगधंदे करायला येणार नाही, असा आक्षेप घेतला. यावर कडी म्हणजे विज्ञान शिक्षिका असलेल्या जेन मॅन या सदस्या म्हणाल्या की, सूर्यप्रकाश मिळाला नाही की परिसरातील वनस्पती कर्बग्रहण क्रियेने स्वत:चे अन्न तयार करू शकणार नाहीत व अखेरीस मरून जातील. जेथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत त्याच्या आसपासच्या झाडांची पाने सुकून गेल्याची आपण पाहिली आहेत, असा स्वानुभवही त्यांनी कथन केला.सौर ऊर्जा पॅनेलमुळे कोणताही दुष्परिणाम झाल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिका सदस्यांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. (वृत्तसंस्था)

भारतातही तेच घडले होतेजागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांचा जास्तीत वापर करण्यावर पॅरिसमध्ये जगभरातील देशांचे एकीकडे एकमत होत असता अमेरिकेसारख्या देशात स्थानिक प्रशासनाने असा बुरसटलेला विचार करावा, ही चिंतेची बाब आहे. अर्थात भारतातही पवनचक्क्यांच्या बाबतीत सुरुवातीस हेच झाले होते. पवनचक्क्यांमुळे वाऱ्याची दिशा बदलते व पावसाचे ढग दूर पळतात, असे म्हणून सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकेकाळी ‘विंड फार्म’ उभारण्यास विरोध केला होता.