शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

By admin | Updated: December 15, 2015 02:55 IST

सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय

रेलिघ (उत्तर कॅरोलिना) : सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय कारणावरून अमेरिकेसारख्या प्रगत देशातील एका शहराने त्यांच्या येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास नकार दिला आहे.उत्तर कॅरोलिना राज्याच्या वूडलॅण्ड शहरातून २५८क्रमांकाचा महामार्ग जातो. या महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव एका खासगी कंपनीने नगरपालिकेकडे दिला होता. येथून जवळच विद्युत उपकेंद्र असल्याने तयार होणारी वीज ग्रीडलाही देणे सोपे होईल म्हणून कंपनीने या ठिकाणाची निवड केली होती.स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या या प्रस्तावावर वूडलॅण्ड नगरपालिकेच्या सभेत झालेल्या चर्चेत सदस्यांनी भीती व शंका उपस्थित केल्याने सौर ऊर्जा प्रकल्प न उभारू देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.नगरपालिकेच्या बैठकीत बॉबी मॅन नामक सदस्याने सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व सूर्यप्रकाशच संपला की शहरात कोणी उद्योगधंदे करायला येणार नाही, असा आक्षेप घेतला. यावर कडी म्हणजे विज्ञान शिक्षिका असलेल्या जेन मॅन या सदस्या म्हणाल्या की, सूर्यप्रकाश मिळाला नाही की परिसरातील वनस्पती कर्बग्रहण क्रियेने स्वत:चे अन्न तयार करू शकणार नाहीत व अखेरीस मरून जातील. जेथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत त्याच्या आसपासच्या झाडांची पाने सुकून गेल्याची आपण पाहिली आहेत, असा स्वानुभवही त्यांनी कथन केला.सौर ऊर्जा पॅनेलमुळे कोणताही दुष्परिणाम झाल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिका सदस्यांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. (वृत्तसंस्था)

भारतातही तेच घडले होतेजागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांचा जास्तीत वापर करण्यावर पॅरिसमध्ये जगभरातील देशांचे एकीकडे एकमत होत असता अमेरिकेसारख्या देशात स्थानिक प्रशासनाने असा बुरसटलेला विचार करावा, ही चिंतेची बाब आहे. अर्थात भारतातही पवनचक्क्यांच्या बाबतीत सुरुवातीस हेच झाले होते. पवनचक्क्यांमुळे वाऱ्याची दिशा बदलते व पावसाचे ढग दूर पळतात, असे म्हणून सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकेकाळी ‘विंड फार्म’ उभारण्यास विरोध केला होता.