शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

..तर मग ‘नॉर्मल’पेक्षा ‘सिझर’च परवडलं!

By admin | Updated: June 14, 2017 17:52 IST

नवीन तंत्राच्या प्रसुतींसाठी सारी सज्जता असेल तरच त्या मार्गानं जा..

- मयूर पठाडेआजकाल कोणत्याही नवजात बालकाच्या आईला विचारा, ती सांगेल, ‘सिझर’ झालं! नैसर्गिक पद्धतीनं बाळ आता जन्माला येईल की नाही, असं वाटावं, इतक्या वेगानं आता सिझर होताना दिसताहेत. नैसर्गिक प्रसुती झालेली आई मिळणं जवळवजळ दुर्मिळच.त्यासाठी काय करता येईल, याबाबत जगभर विचारविनिमिय आणि संशोधन चालू आहे. आई पालक, बाबा पालक आणि अगदी प्रसुतीतज्ञांचंही याबाबत समुपदेशन सुरू आहे. आजकाल सगळीकडेच सिझरचं प्रमाण मोठं आहे, यामागे आर्थिक कारण तर आहेच, पण त्यासाठीच्या ‘कळा’ सोसण्याची तयारी आणि वेळही आजकाल अनेकांकडे नाही. सगळ्यांना सगळं काही झटपट हवं.नवीनच आई होऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच तरुण मुली तर स्वत:च डॉक्टरांना सांगतात, माझं सिझर करा. एवढं दुखणं सोसायची माझी तयारी नाही, पण माझं बाळ मात्र मला हव्या त्या तारखेला, हव्या त्या वेळेला, ‘मुहुर्ता’वरच जन्माला येऊ द्या, अशी गळही त्या डॉक्टरांना घालतात.

 

सिझरिअन डिलिव्हरीचं प्रमाण कमी व्हावं आणि बाळ ‘नैसर्गिकरित्या’ जन्माला यावं म्हणून अलीकडे बऱ्याच ठिकाणी ‘फोर्सेप’ आण ‘व्हॅक्यूम’ डिलिव्हरीचाही पर्याय हाताळला जातो. खरं तर पूर्ण नैसर्गिक नाही आणि पूर्ण सिझरही नाही, असा हा मधलाच प्रकार आहे. आपल्यासह अनेक देशांत या पर्यायाचा वापर सध्याही सुरू आहे. पण यासंदर्भातही अलीकडेच एक मोठं संशोधन झालं. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबियाच्या शास्त्रज्ञांनी एक विस्तृत अभ्यास केला. हा अभ्यास होता, चिमट्याच्या साहाय्यानं केलेली ‘फोर्सेप’ डिलेव्हरी, व्हॅक्यूम डिलेव्हरी चांगली की सिझर?या शास्त्रज्ञांचं एकमतानं म्हणणं पडलं की, त्यापेक्षा ‘सिझर’ केव्हाही चांगलं! याचं मुख्य कारण म्हणजे अनेक देशांत आणि हॉस्पिटल्समध्ये त्यासंदर्भात ऐनवेळची आपत्कालिन परिस्थिती हाताळता येऊ शकेल अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे उलट परिस्थिती आणखी बिकट होते आणि त्यामुळे बाळाला आणि बाळाच्या आईलाही आणखी कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागू शकतं.

 

संशोधकांचं म्हणणं आहे, प्रसुतीसाठी फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरीच्या तंत्राचा वापर करताना आलेल्या अडचणी जर नीट हाताळता आल्या नाहीत, तर त्यामुळे होणारा धोका सिझेरिअन प्रसुतीपेक्षा तब्बल पाच पटींनी वाढतो. त्यामुळे बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जीवालाही धोका संभवू शकतो.शास्त्रज्ञांनी त्यासाठी तब्बल दहा वर्षे दोन लाख डिलिव्हरींचा अभ्यास केला. त्यांचा डाटा तपासला. फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी तंत्राचा वापर करताना ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा तज्ञ डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागला आणि तातडीची मदत पुरवावी लागली.