शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

...तर भाजपचा पराभव शक्य, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 11:33 IST

कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेल्याचं केलं वक्तव्य.

सांता क्लारा (अमेरिका) : भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर विरोधकांची योग्यरीत्या एकजूट झाली तर  केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे अनिवासी भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष या संदर्भात काम करत आहे आणि याबाबत योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मंगळवारी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमधील एका कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरे देताना गांधी म्हणाले की, एक राजकारणी म्हणून मी भाजपचा कमकुवतपणा स्पष्टपणे पाहू शकतो... जर विरोधी पक्ष योग्य पद्धतीने तयार झाला तर भाजपचा पराभव होऊ शकतो. कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणुका लढण्यासाठी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारला, कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेला.

पंतप्रधान देवालाही समजावून सांगतील...भारतात असे लोक आहेत ज्यांना वाटते की, ते देवापेक्षा जास्त जाणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उदाहरण आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया येथे अमेरिकी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसद्वारे आयोजित ‘मोहब्बत की दुकान’ कार्यक्रमात केली. ‘हे लोक इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्ध कसे लढायचे ते सांगू शकतात. मुद्दा असा आहे की, ते ऐकायला तयार नाहीत. जर तुम्ही मोदीजींना देवाजवळ बसवले तर ते देवाला समजावून सांगतील की, हे विश्व कसे चालते आणि देवालाही आश्चर्य वाटेल की, मी काय निर्माण केले आहे!’

धक्काबुक्की झाल्यानंतर म्हणाले...कॅलिफोर्नियातील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने धक्काबुक्की केली, ज्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या भाषणात काही काळ व्यत्यय आणला. राहुल गांधींनी घोषणाबाजीला उत्तर देताना स्मितहास्य केले आणि म्हणाले, ‘स्वागत आहे, स्वागत आहे... नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान.’ त्यानंतर त्यांनी समर्थकांसह प्रेक्षकांमध्ये सामील होऊन ‘भारत जोडो’च्या घोषणांनी उत्तर दिले.

अध्यक्ष ठरवणार पंतप्रधानपदाचा उमेदवारविरोधी एकजुटीसाठी आम्ही काम करत आहोत; परंतु मला वाटते की, भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी एकजुटीपेक्षा आणखी काहीतरी जास्तीचे लागेल, त्यासाठी पर्यायी दृष्टिकोन हवा आहे. भारत जोडो यात्रा ही अशी दृष्टी निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. ‘भारत जोडो यात्रे’च्या कल्पनेशी कोणताही विरोधी पक्ष असहमत असणार नाही,’ असे ते म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील. 

समस्या बदलणार नाहीत : काँग्रेसबेरोजगारी, वाढती महागाई आणि द्वेषाचा प्रसार हे लोकांना त्रास देणारे खरे मुद्दे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला तरी या समस्या कायम राहतील.जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

राहुल ‘बनावट’ गांधी आहेतराहुल गांधी ‘बनावट गांधी’ आहेत. त्यांना काहीच माहीत नाही, परंतु ते प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ बनले आहेत.प्रल्हाद जोशी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका