शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:20 IST

पाकची बढाई : म्हणे मुद्दाम लक्ष्य टाळले

इस्लामाबाद : भारताने मंगळवारी आमच्या हवाई हद्दीत शिरून केलेल्या हल्ल्याला आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो, याची चुणूक दाखविण्यासाठी आमच्या हवाई दलाने बुधवारी भारतीय हवाई हद्दीत शिरलो. तेथील लष्करी तळावर हल्ला करणे सहज शक्य असूनही तेटाळून मोकळ्या, निर्जन जागेत हल्ला करून माघार घेतली, अशी बढाई दावा पाकिस्तानने मारली आहे.

पाकिस्तानी सैन्यदलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले की, पाकिस्तान हवाई दलाची विमाने त्यांना नेमून दिलेले मिशन ‘फत्ते’ करून परत आल्यावर, त्याला प्रत्तुत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमाने हवाई हद्दीचा भंग करून पाकिस्तानच्या हद्दीत घुसली. पाकिस्तान हवाई दलाने भारताची त्यापैकी विमाने पाडली. एक विमान आझाद काश्मीरमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) पडले, तर दुसरे जम्मू-काश्मीर पडले.भारताच्या पाडलेल्या विमानांच्या दोन वैमानिकांना त्या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांनी ताब्यात घेतले. यापैकी एका जखमी वैमानिकास लष्कराच्या कमांड इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असेही पाकिस्तानचा हा प्रवक्ता म्हणाला. या दोघांना आंतरराष्ट्रीय नियमांनुसार वागणूक दिली जाईल, असेही ते म्हणाले.

जनरल गफूर यांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच पाकिस्तान सरकारने त्यांनी पकडलेल्या एका भारतीय वैमानिकाच्या व्हिडीओ जारी केला. चेहऱ्यावर फडके बांधलेली व्यक्ती, माझे नाव विंग कमांडर अभिनंदन असून, मी भारतीय हवाई दलाचा अधिकारी आहे, असे सांगताना या व्हिडीओत दिसले. संध्याकाळपर्यंत पाकिस्तानने यातही फिरवाफिरवी करत आपल्या ताब्यात भारताचा फक्त एकच वैमानिक असल्याची पलटी खाल्ली. आम्ही मिशन ठरविताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताची सहा ठिकाणे लक्ष्य म्हणून निश्चित केली होती.ती सर्व लक्ष्ये आमच्या विमानांच्या माऱ्याच्या सहज टप्प्यातही होती, परंतु भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य न करता, आमच्या विमानांनी त्यापासून दूर मोकळ्या जागेवर बॉम्ब टाकले. (वृत्तसंस्था)क्षमता आहे, पण शांतता हवीजनरल गफूर म्हणाले की, प्रतिहल्ला करण्याचा आमचा हक्क आहे, तशी आमची क्षमताही आहे, पण परिस्थिती चिघळविण्याची आमची इच्छा नाही. आमच्यावर वेळच आणली गेली, तर त्यासाठीही आमची तयारी आहे. आपला कांगावा पुढे सुरूठेवताना गफूर म्हणाले की, आम्ही ते स्वसंरक्षणासाठी केले असल्याने, त्यात विजयी झाल्याचा दावा करण्याची आमची इच्छा नाही. शांतता हवी असल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असे लक्ष्य आम्ही निवडले.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान