शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आमचा हल्ला क्षमतेची चुणूक दाखविण्यापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:20 IST

पाकची बढाई : म्हणे मुद्दाम लक्ष्य टाळले

इस्लामाबाद : भारताने मंगळवारी आमच्या हवाई हद्दीत शिरून केलेल्या हल्ल्याला आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो, याची चुणूक दाखविण्यासाठी आमच्या हवाई दलाने बुधवारी भारतीय हवाई हद्दीत शिरलो. तेथील लष्करी तळावर हल्ला करणे सहज शक्य असूनही तेटाळून मोकळ्या, निर्जन जागेत हल्ला करून माघार घेतली, अशी बढाई दावा पाकिस्तानने मारली आहे.

पाकिस्तानी सैन्यदलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले की, पाकिस्तान हवाई दलाची विमाने त्यांना नेमून दिलेले मिशन ‘फत्ते’ करून परत आल्यावर, त्याला प्रत्तुत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमाने हवाई हद्दीचा भंग करून पाकिस्तानच्या हद्दीत घुसली. पाकिस्तान हवाई दलाने भारताची त्यापैकी विमाने पाडली. एक विमान आझाद काश्मीरमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) पडले, तर दुसरे जम्मू-काश्मीर पडले.भारताच्या पाडलेल्या विमानांच्या दोन वैमानिकांना त्या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांनी ताब्यात घेतले. यापैकी एका जखमी वैमानिकास लष्कराच्या कमांड इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असेही पाकिस्तानचा हा प्रवक्ता म्हणाला. या दोघांना आंतरराष्ट्रीय नियमांनुसार वागणूक दिली जाईल, असेही ते म्हणाले.

जनरल गफूर यांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच पाकिस्तान सरकारने त्यांनी पकडलेल्या एका भारतीय वैमानिकाच्या व्हिडीओ जारी केला. चेहऱ्यावर फडके बांधलेली व्यक्ती, माझे नाव विंग कमांडर अभिनंदन असून, मी भारतीय हवाई दलाचा अधिकारी आहे, असे सांगताना या व्हिडीओत दिसले. संध्याकाळपर्यंत पाकिस्तानने यातही फिरवाफिरवी करत आपल्या ताब्यात भारताचा फक्त एकच वैमानिक असल्याची पलटी खाल्ली. आम्ही मिशन ठरविताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताची सहा ठिकाणे लक्ष्य म्हणून निश्चित केली होती.ती सर्व लक्ष्ये आमच्या विमानांच्या माऱ्याच्या सहज टप्प्यातही होती, परंतु भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य न करता, आमच्या विमानांनी त्यापासून दूर मोकळ्या जागेवर बॉम्ब टाकले. (वृत्तसंस्था)क्षमता आहे, पण शांतता हवीजनरल गफूर म्हणाले की, प्रतिहल्ला करण्याचा आमचा हक्क आहे, तशी आमची क्षमताही आहे, पण परिस्थिती चिघळविण्याची आमची इच्छा नाही. आमच्यावर वेळच आणली गेली, तर त्यासाठीही आमची तयारी आहे. आपला कांगावा पुढे सुरूठेवताना गफूर म्हणाले की, आम्ही ते स्वसंरक्षणासाठी केले असल्याने, त्यात विजयी झाल्याचा दावा करण्याची आमची इच्छा नाही. शांतता हवी असल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असे लक्ष्य आम्ही निवडले.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान