शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ

By admin | Updated: October 1, 2016 12:35 IST

भारताने घरात घुसून हल्ला केल्यानंतर जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - भारताने घरात घुसून हल्ला केल्यानंतर जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. सर्जिकल स्ट्राईक काय असतात, हे आम्ही भारताला दाखवू अशी धमकीच हाफिज सईदने दिली आहे. 
 
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
(भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?)
 
शुक्रवारी फैसलाबादमध्ये हाफिज सईदच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना हाफिजने भारताला धमकी देताना भारतीय माध्यमांनाही लक्ष केलं. 'उरी हल्ल्यानंतर भारतीय माध्यमांनी केवळ त्यांचे 20च जवान मारले गेल्याचा दावा केला तो खोटा आहे. या हल्ल्यात 177 हून अधिक भारतीय ठार झाले होते. आमच्यावर सूड उगवण्यासाठी एक झलक दाखवण्यात आली. यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हे भारताला दाखवून देऊ', असं हाफिज सईद बोलला आहे. हाफिज सईदने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही लक्ष्य केलं.
 
('उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ)
(उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल)
 
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकिस्तानचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकिस्तानने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.
 
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
 
जम्मू-काश्मीरमधील  'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ते १७ तळ सुरक्षित स्थळी हलवले होते, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.  ' भारताकडून जोरदार हल्ला होण्याची कुणकुण लागताच लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने 'लष्कर -ए-तोयब', ' जैश-ए -मुहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दी'नचे दहशतवादी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. मनसेहरा व मुझफ्फराबाद येथून कार्यरत असलेले ४ दहशतवादी तळही हलवण्यात आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले.