शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

सौदीत कुटुंब कर, भारतीय परतणार मायदेशी

By admin | Updated: June 21, 2017 15:09 IST

सौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू होणार आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

रियाध, दि. 21 - सौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू होणार आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत. 
 
सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली. 
 
ज्यांना महिन्याला 5 हजार रियाल म्हणजे 86 हजार रुपये वेतन आहे त्यांना सौदी अरेबियामध्ये कौटुंबिक व्हिसा मिळतो. नव्या नियमामुळे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहणा-या प्रत्येकाला महिन्याला 300 रियाल म्हणजे 5100 रुपये डिपेंडट फी भरावी लागेल. 2020 पर्यंत प्रत्येक व्यक्तीची डिपेंडटी फी 100 रियालने वाढत जाणार आहे. म्हणजे 2020 साली प्रत्येक व्यक्तीसाठी दर महिन्याला 400 रियाल सरासरी 6900 रुपये भरावे लागतील. 
 
महत्वाचा म्हणजे ही फी अॅडव्हान्समध्ये भरावी लागणार आहे. पत्नी वर्षभर सौदीमध्ये राहणार असेल तर, 1200 रियाल अॅडव्हान्समध्ये भरावे लागतील. पत्नी आणि दोन मुले असणा-यांना वर्षाला 3600 रियाल म्हणजे 62 हजार रुपये भरावे लागतील. काही कंपन्या त्यांच्या कर्मचा-यांना डिपेंडट फी ची भरपाई देण्याचा विचार करत आहे. अनेकांकडे पर्याय नसल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाला मायदेशी पाठवावे लागत आहे. तेलाच्या किंमती घसरल्यामुळे सौदी अरेबियाच्या उत्पनात घट झाली आहे. डिपेंडट फी उत्पन वाढविण्याचा एक भाग आहे.