शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंगने अखेर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:13 IST

आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.

सेऊल : आपल्या काही कारखान्यांत काम केल्यामुळे काही कामगारांना कॅन्सर झाल्याबद्दल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अखेर माफी मागून भरपाई देण्याचे मान्य केल्याने दशकभराच्या वादावर पडदा पडला.मृत्युमुखी पडलेल्या एका २२ वर्षीय तरुण कामगाराचा पिता व सॅमसंगचे सह-अध्यक्ष कीम की-नाम यांनी एका औपचारिक तडजोड करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इतर पीडितांनाही करारानुसार लाभ देण्याचे कंपनीने मान्य केले. तडजोडीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक पीडित कामगार वा त्याच्या कुटुंबास १ लाख ३३,000 डॉलरची भरपाई देईल. ही भरपाई १९८४ पर्यंतच्या जुन्या कामगारांना मिळेल. एकूण १६ प्रकारचे कॅन्सर, गर्भपात, कामगारांच्या मुलांना जडलेले विविध प्रकारचे जन्मजात आजार यांसाठी ही भरपाई दिली जाईल.याबाबत कीम की-नाम म्हणाले की, आजारी पडलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही माफी मागतो. सेमीकंडक्टर निर्मितीच्या कारखान्यांत आरोग्यविषक जोखमीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आम्ही अपयशी ठरलो. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्यांत काम करणाºया २४0 कामगारांना आजारपण जडले होते. त्यातील ८0 जण दगावले. त्यात तरुण महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. (वृत्तसंस्था)२००७ साली उघडकीसहे प्रकरण २00७ मध्ये उघडकीस आले होते. सुवोन येथील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कारखान्याच्या अनेक माजी कामगारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आजारपणाची माहिती उघड केली होती. याप्रकरणी सुमारे १0 वर्षे कोर्टकचेºया चालल्या. न्यायालयांसह सेऊलची कामगार कल्याण संस्था तसेच एका मध्यस्थ संस्थेने याप्रकरणी अनेक निवाडे दिले. अखेर कंपनीने आपली चूक मान्य करून कामगारांशी तडजोड केली आहे.

टॅग्स :samsungसॅमसंग