शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:10 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत.

बीजिंगः भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. देशात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत-चीनचे संबंध स्थिर राहणे गरजेचे आहे. जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग क्विशान यांच्याशी झोंग्ननहाईदरम्यान भेट घेतली आहे.त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत एक बैठक घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू वांग यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, आमचं दोन वर्षांपूर्वीच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात एकमत झालेलं आहे. देश अनिश्चिततेतून जात असताना आपले संबंध स्थिर राहण्याची गरज आहे.चीनमध्ये पुन्हा आल्यानं मी आनंदात आहे. माझी मागची वर्ष मी आनंदानं स्मरण करतो. मी नशीबवान आहे, मला अनौपचारिक पद्धतीनं शिखर संमेलनाची तयारी करण्याची संधी मिळाली.  जयशंकर यांचं स्वागत करत उपराष्ट्रपती वांग म्हणाले, मला हेसुद्धा माहीत आहे की, चीनमध्ये बऱ्याच काळापासून राहणारे जयशंकर हे भारतीय राजदूत आहेत. दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही वांग म्हणाले. जयशंकर यांच्या या दौऱ्यात चार द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे.