शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 15:17 IST

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

ठळक मुद्देआता रशियातील वृत्तसंस्थेचा दावागलवान खोऱ्यातील झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेलेभारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याची माहिती

मॉस्को : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून सुरू असलेला तणाव आता निवळेल, असे म्हटले जात आहे. कारण, भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत सांगितले. यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने गतवर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेले होते, असा दावा केला आहे. (russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india)

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांचे सुमारे ५० हजार सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यातील सैन्य स्तरीय चर्चा सुरू झाल्यानंतर चीनने गलवान खोऱ्यातील झटापटीत पाच सैनिक मारले गेले होते, असे कबूल केले होते. मात्र, अमेरिका आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत चीनचे किमान ४० सैनिक मारले गेले होते. यानंतर आता रशियाच्या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानंतर पुन्हा हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावrussiaरशिया