शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 15:17 IST

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

ठळक मुद्देआता रशियातील वृत्तसंस्थेचा दावागलवान खोऱ्यातील झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेलेभारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याची माहिती

मॉस्को : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून सुरू असलेला तणाव आता निवळेल, असे म्हटले जात आहे. कारण, भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत सांगितले. यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने गतवर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेले होते, असा दावा केला आहे. (russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india)

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांचे सुमारे ५० हजार सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यातील सैन्य स्तरीय चर्चा सुरू झाल्यानंतर चीनने गलवान खोऱ्यातील झटापटीत पाच सैनिक मारले गेले होते, असे कबूल केले होते. मात्र, अमेरिका आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत चीनचे किमान ४० सैनिक मारले गेले होते. यानंतर आता रशियाच्या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानंतर पुन्हा हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावrussiaरशिया