शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

By admin | Updated: December 3, 2015 03:14 IST

वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे

लंडन : वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधत वेळीच उपाययोजना करण्यास सुचविले आहे. समुद्राचे तापमान काही अंशांनी वाढल्यास पृथ्वीवरील आॅक्सिजनचे (प्राणवायू) प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी मोठ्या संख्येने प्राणी आणि लोकांच्या मृत्यूने सृष्टीचे रूपांतर मरुभूमीत होऊ शकते, असा इशारा या संशोधकांनी दिली आहे. पृथ्वीवरील वाढते तापमान अधिक वाढणार नाही, यासाठी काय काय उपाय करणे जरूरी आहेत, यावर पॅरिस येथे जगभरातील नेते, पर्यावरणतज्ज्ञ विचारमंथनासाठी एकवटले असताना ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी आॅफ लिसेस्टरमधील संशोधकांनी हा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढत समस्त मानवजातीचे डोळे उघडले आहेत. समुद्राचे तापमान २१०० पर्यंत जवळपास ६ अंश सेल्सियसवर गेल्यास आॅक्सिजनचे उत्सर्जनच संपुष्टात येईल. आॅक्सिजनच अवघ्या सृष्टीचा प्राण आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास एकूणच जीवसृष्टीचा नाश ओढवेल. (वृत्तसंस्था)पृथ्वीचे वाढते तापमान हा मुद्दा राजकीय आणि विज्ञानजगताच्या ऐरणीवर येऊन तब्बल दोन दशके झाली आहेत. पृथ्वीचे तापमान सारखे वाढत राहिल्यास सृष्टीवर कोणती संकटे कोसळतील, याबाबत या संशोधकांनी सविस्तर ऊहापोह केला आहे.पृथ्वीवर भविष्यात ओढवणाऱ्या संकटापैकी सर्वाधिक भयानक संकट असेल ते पुराचे थैमान. अंटार्टिकामधील बर्फ वितळून येणाऱ्या पुराने जगभरात हाहाकार उडेल. परिणामी जीवसृष्टीचा नाश होऊ शकतो, असे या विद्यापीठातील गणित विभागाचे प्रो. सर्गेई पेट्रोव्हस्की यांनी सांगितले.