शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 22:39 IST

Ranil Wickremesinghe News: देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे.

कोलंबो - देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी त्यांचं प्राधान्य अर्थव्यवस्था सुरळीत करून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास असेल, असं सांगितलं. त्यांनी भारताबरोबरच्या संबंधांबाबत सांगितलं की, आपल्या कार्यकाळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, असे विक्रमसिंघे म्हणाले.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रमसिंघे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी अर्थव्यवस्थेच्या उत्थानाचे आव्हान स्वीकारले आहे. मी हे आव्हान अवश्य पूर्ण करेन, यावेळी त्यांना भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याबाबत विक्रमसिंघे म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध हे आधीपेक्षा अधिक चांगले होतील. रानिल विक्रमसिंघे देशातील सर्वात जुन्या पक्ष असलेल्या युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते आहेत. चारवेळा त्यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत यूएनपीला एकही जागा जिंकता आली नाही. यूएनपीचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या कोलंबो मतदारसंघातून विक्रमसिंघे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. कम्युलेटिव्ह नॅशनल व्होटच्या आधारे यूएनपीला एक जागा देण्यात आली. त्या माध्यमातून विक्रमसिंघे संसदेत पोहोचले.

आतापर्यंत चारवेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावरून हटवलं. मात्र दोनच महिन्यांत त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतली. आता त्यांना सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना आणि विरोधी पक्ष असलेल्या समगी जन बालावेगायामधील एका गटासह अन्य अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका