शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाऊण पृथ्वीवर पाऊस अस्थिर; जागतिक हवामान बदलांमुळेच अचानक अतिवृष्टी अन् भीषण दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:01 IST

ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

सिडनी : गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे, विशेषत: ऑस्ट्रेलिया, युरोप आणि ईशान्य अमेरिकेवर हा प्रभाव अधिक आहे. त्यामुळेच अचानक वादळी पाऊस, भीषण दुष्काळ, असे प्रकार अधिक वाढले आहेत, असे ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

चिनी संशोधक आणि ब्रिटिश हवामान विभागाने केलेले यासंदर्भातील निष्कर्ष विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. हवामान बदल पावसाला अधिक अस्थिर करत आहेत आणि हा बदल आणखी वाढत जाईल, असा या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांनुसार  गेल्या १०० वर्षांमध्ये विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये पावसाची अस्थिरता अधिक वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान बदल चालू राहिल्याने ही समस्या आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे दुष्काळ आणि पूर या दोन्हींचा धोका वाढतो. दैनंदिन पर्जन्यमानातील बदल जगभरात सर्व ऋुतुंमध्ये आढळल्याचे संशाेधकांनी अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

ग्लोबल वाॅर्मिंगचा पावसावर कसा परिणाम होतो?

संशोधकांचे निष्कर्ष समजून घेण्यासाठी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणते घटक वादळ किती प्रचंड प्रमाणात पाऊस निर्माण करतात आणि जागतिक हवामान बदलांमुळे (ग्लोबल वॉर्मिंग) या घटकांवर कसा परिणाम होतो.

पहिला घटक म्हणजे हवेत पाण्याची वाफ किती आहे. उष्ण हवेत जास्त ओलावा असू शकतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ठराविक क्षेत्रावरील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण सरासरी सात टक्क्यांनी वाढते.

शास्त्रज्ञांना या समस्येबद्दल कित्येक वर्षांपासून कल्पना आहे. औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यातून वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

अभ्यासात काय आढळले?

संशोधनात दिसून आले आहे की, १९०० च्या दशकापासून पावसाच्या अस्थिरतेत पद्धतशीर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पर्जन्यमानातील दैनंदिन परिवर्तनशीलता दर दशकात १.२ टक्क्यांनी वाढला आहे.

अस्थिरता वाढणे म्हणजे कालांतराने पावसाचे वितरण अधिक असमान होत जाते. ज्यामुळे कमी वेळेत एकतर अतिवृष्टी होते किंवा अत्यंत कमी पाऊस पडतो. याचा अर्थ असा की, दिलेल्या ठिकाणी वर्षभराचा पाऊस आता कमी दिवसांत पडतो. दीर्घकालीन दुष्काळात पूर येऊ शकतो, किंवा दुष्काळाची तीव्रता आणखी वाढू शकते. 

संशोधकांनी वर्ष १९०० पासून उपलब्ध असलेल्या माहितीचा सखाेल अभ्यास केल्यानंतर आढळले की, जमिनीच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागांत पावसाची अस्थिरता वाढली आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि पूर्व उत्तर अमेरिका हे भूभाग विशेषतः प्रभावित झाले आहेत.

 

टॅग्स :floodपूर