शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुस्लीम देशांनी मदत नाकारल्यानेच पाकिस्तानने दिला चर्चेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:18 IST

सारीच राष्ट्रे नाराज : दहशतवाद्यांना पाक आश्रय देत असल्याची तक्रार

- संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना भारताने हवाई हल्ले करून नष्ट केल्यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली व बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला. तो भारताने मोडून काढल्यानंतर मात्र, पाकिस्तानने युद्धाच्या दिशेने जाण्याचे धाडस दाखविण्याऐवजी पंतप्रधान इमरान खान यांनीच चर्चेची तयारी दाखविली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचा पाठीराखा चीनने जैश-ए-महंमदवरील कारवाईसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जारी केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केली. शिवाय पाकिस्तान ज्या मुस्लीम देशांवर विसंबून होता, त्यांनीही त्याला शांतता राखण्याचे आवाहन करीत दहशतवाद प्रशिक्षणाचे तळ नष्ट करावेत, असे सुनावले.

फ्रान्स सतत पाकिस्तानला दहशतवादी तळ नष्ट करण्याचा सल्ला देत आला आहे. आता ऑस्ट्रेलियानेही तोच इशारा दिला आहे. अशा स्थितीत युद्ध झाल्यास आपणास भारताच्या कारवाईला सामोरे जावे लागेल आणि मदतीला कोणीच येणार नाही, असे पाकिस्तानच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी चर्चेची आणि शांततेची भाषा सुरू केली आहे.

मुस्लीम देशांचे महासंघटन ओआयसीने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन), ५० वर्षांनंतर इतिहासात प्रथमच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना विशेष पाहुण्या या नात्याने ओआयसीच्या कार्यवाहीत सहभागी होण्यासाठी नामंत्रित केले आहे. हा पाकिस्तानला मोठा झटका आहे, कारण तो ओआयसीचा संस्थापक सदस्य आहे. ओआयसीच्या सदस्य देशांनी म्हटले की, भारतात कोट्यवधी मुसलमान अल्पसंख्याक असूनही त्यांना बहुसंख्यांकांसारखे अधिकार आहेत. तेथे त्यांच्याशी कोणताही भेदभाव होत नाही. भारताने जागतिक शांततेसाठी सतत कार्य केले आहे. या घडामोडींमुळे ओआयसीतील मुस्लीम देशही पाकिस्तानला मदत करतील, असे दिसत नाही. पाकिस्तानच्या रणनीतीला यामुळे मोठा फटका बसला आहे.

यानंतर, पाकिस्तानला याची जाणीव झाली की, भारताशी आपण युद्ध केले वा झाले, तर मुस्लीम देश आपल्यासोबत क्वचितच उभे राहतील. भारतच नव्हे, तर पाकिस्तानचे शेजारी सगळे देशही त्याच्या अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या धोरणावर नाराज आहेत. यात इराण आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. इराणने म्हटले आहे की, आमच्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे फक्त पाकिस्तानच आहे. अफगाणिस्तानही तेथील अस्थिरतेमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळेच मुस्लीम देश त्याच्यापासून दूर जात आहेत.हा अधिकारी म्हणाला की, भारताच्या जागतिक पातळीवरील बळकट बनलेल्या राजकीय स्थितीमुळेही पाकिस्तानला वेगळे पाडण्यात खूप मदत झाली आहे.

सौदी अरबचा पाठिंबा मिळणे अवघडपाकिस्तानचा सगळ्यात मोठा सहानुभूतीदार देश सौदी अरब आहे. त्याचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यात २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा इरादाही व्यक्त केला होता, परंतु त्यानंतर ते भारतात आले. त्यांनी दहशतवादाचा निषेधही केला. त्यांनी भारतात पाकिस्तानच्या तुलनेत फार मोठ्या (१०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त) गुंतवणुकीची घोषणाही केली. यामुळे सौदीकडून आपणास युद्ध परिस्थितीत मदत मिळणे अवघड असल्याचे पाकिस्तानच्या लक्षात आले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक