शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:30 IST

या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

कोलंबो - पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीनं शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार 225 सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने 145 जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण 150 जागा जिंकल्या. अशा प्रकारे पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. पक्षाला 68 लाख म्हणजेच 59.9 टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या जबरदस्त विजयाबद्दल त्यांना अभिनंदन करणारे पहिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले की, दोन्ही बाजू सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्याचे कार्य करतील आणि विशेष संबंध नवीन उंचावर नेले जातील. ही माहिती देताना राजपक्षे यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर माझे अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद." श्रीलंकेच्या जनतेच्या पाठिंब्याने दोन्ही देशांमधील दीर्घकाळ कामकाज सुरू ठेवण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. ”महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. 'महिंदा राजपक्षे यांना भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास आवडेल'आंतरराष्ट्रीय कामकाज तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, श्रीलंका स्वत: च्या फायद्यासाठी भारत आणि चीनकडून फायदा घेत आहे. श्रीलंका आपले काही प्रकल्प चीन आणि काही भारताला हलवण्याच्या विचारात आहे. महिंदा राजपक्षे यांना दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवायचे आहेत. चीनशी चांगले संबंध असले तरी भारताशी संबंध बिघडू न देण्याचं राजपक्षे यांचे धोरण आहे. भारत हा एक मोठा शेजारी देश आहे आणि येत्या काळात भारताशी शत्रुत्व त्यांना महागात पडू शकते. इतकेच नव्हे तर श्रीलंकेतील सिंहला आणि तमीळ समुदायाच्या लोकांनाही भारताशी त्यांचे संबंध बिघडू नये, अशी इच्छा आहे. राजपक्षे यांनी चीनला श्रीलंकेत लष्करी कारवाया करू देऊ नयेत, अशी भारताची इच्छा आहे.दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. रहिस सिंह म्हणतात, "राजपक्षे हे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात चीन समर्थक राहिले. त्यांनी श्रीलंकेचे चीनच्या उपनगरीत रूपांतर केले. राजपक्षे यांच्या मते आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेच धोरण पुढेही सुरू ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे चीन आपल्यावर सतत हल्ला करत आहे. एकीकडे त्याला लडाखमधील जमीन ताब्यात घ्यायची आहे, तर ड्रॅगनच्या भारताच्या शेजारी देश नेपाळ, बांगलादेशातही कुरबुरी सुरू आहेत. नेपाळही भारताला डोळे दाखवायला लागला आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने आहे, बांगलादेश आणि चीनमधील मैत्री वाढत आहे.राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल. हंबनटोटा बंदर 99 वर्षं चीनला दिलेआपल्या आधीच्या कार्यकाळात राजपक्षे यांनी चीनबरोबर अनेक करार केले होते, ज्यामुळे भारत आणि पाश्चात्य देशांचा ताण वाढला होता. 2017मध्ये राजपक्षे यांनी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यावर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी चीनला दिले. हे बंदर भारताच्या अगदी जवळ आहे. राजपक्षे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी तमीळ बंडखोरांवर निर्दयीपणे अत्याचार केल्याची चर्चा आहे.