शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:30 IST

या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

कोलंबो - पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीनं शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार 225 सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने 145 जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण 150 जागा जिंकल्या. अशा प्रकारे पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. पक्षाला 68 लाख म्हणजेच 59.9 टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या जबरदस्त विजयाबद्दल त्यांना अभिनंदन करणारे पहिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले की, दोन्ही बाजू सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्याचे कार्य करतील आणि विशेष संबंध नवीन उंचावर नेले जातील. ही माहिती देताना राजपक्षे यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर माझे अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद." श्रीलंकेच्या जनतेच्या पाठिंब्याने दोन्ही देशांमधील दीर्घकाळ कामकाज सुरू ठेवण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. ”महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. 'महिंदा राजपक्षे यांना भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास आवडेल'आंतरराष्ट्रीय कामकाज तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, श्रीलंका स्वत: च्या फायद्यासाठी भारत आणि चीनकडून फायदा घेत आहे. श्रीलंका आपले काही प्रकल्प चीन आणि काही भारताला हलवण्याच्या विचारात आहे. महिंदा राजपक्षे यांना दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवायचे आहेत. चीनशी चांगले संबंध असले तरी भारताशी संबंध बिघडू न देण्याचं राजपक्षे यांचे धोरण आहे. भारत हा एक मोठा शेजारी देश आहे आणि येत्या काळात भारताशी शत्रुत्व त्यांना महागात पडू शकते. इतकेच नव्हे तर श्रीलंकेतील सिंहला आणि तमीळ समुदायाच्या लोकांनाही भारताशी त्यांचे संबंध बिघडू नये, अशी इच्छा आहे. राजपक्षे यांनी चीनला श्रीलंकेत लष्करी कारवाया करू देऊ नयेत, अशी भारताची इच्छा आहे.दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. रहिस सिंह म्हणतात, "राजपक्षे हे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात चीन समर्थक राहिले. त्यांनी श्रीलंकेचे चीनच्या उपनगरीत रूपांतर केले. राजपक्षे यांच्या मते आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेच धोरण पुढेही सुरू ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे चीन आपल्यावर सतत हल्ला करत आहे. एकीकडे त्याला लडाखमधील जमीन ताब्यात घ्यायची आहे, तर ड्रॅगनच्या भारताच्या शेजारी देश नेपाळ, बांगलादेशातही कुरबुरी सुरू आहेत. नेपाळही भारताला डोळे दाखवायला लागला आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने आहे, बांगलादेश आणि चीनमधील मैत्री वाढत आहे.राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल. हंबनटोटा बंदर 99 वर्षं चीनला दिलेआपल्या आधीच्या कार्यकाळात राजपक्षे यांनी चीनबरोबर अनेक करार केले होते, ज्यामुळे भारत आणि पाश्चात्य देशांचा ताण वाढला होता. 2017मध्ये राजपक्षे यांनी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यावर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी चीनला दिले. हे बंदर भारताच्या अगदी जवळ आहे. राजपक्षे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी तमीळ बंडखोरांवर निर्दयीपणे अत्याचार केल्याची चर्चा आहे.