शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा; चिनी सरकारचे नागरिकांना आदेश; ड्रॅगन युद्धाच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:46 IST

अत्यावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ; अनेक ठिकाणी तुटवडा जाणवू लागल्यानं प्रशासन अडचणीत

बीजिंग: विस्तारवादी धोरणामुळे डझनभरहून अधिक देशांशी संघर्ष करणाऱ्या चीनमध्ये सध्या वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. चीन तैवानसोबत युद्ध घोषित करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारनं आपल्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे अन्नधान्य, मीठ, साखर, तेल यासारख्या वस्तूंना असलेली मागणी वाढली आहे.

चीनमधील अनेक भागांत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक भागांत स्थानिक प्रशासनाला मागणीनुसार पुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचं आव्हानही प्रशासनासमोर आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये बऱ्याच कालावधीपासून तणावाची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळली आहे. चीननं वारंवार तैवानला कारवाईची धमकी दिली आहे.

सोमवारी रात्री उशिरा चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असलेल्या वस्तूंचा साठा करण्याचे आदेश देण्यात आले. 'कोविड-१९ चा वाढलेला प्रादुर्भाव आणि मुसळधार पाऊस यांच्यामुळे भाज्या आणि इतर वस्तूंच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा,' अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र चिनी सोशल मीडिया विवोवर वेगळीच चर्चा आहे. शेजारी राष्ट्र असलेल्या तैवानसोबत तणाव वाढल्यानं अशा प्रकारचे आदेश जारी करण्यात आल्याचा चिनी नागरिकांचा अंदाज आहे.

सरकारनं जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याच्या सूचना करताच आसपासच्या सर्व वृद्ध व्यक्ती सुपरमार्कटमध्ये खरेदीसाठी पोहोचल्या, असं एका यूजरनं विवोवर लिहिलं आहे. स्थानिक माध्यमांनी नुकतीच बिस्किट्स, इन्स्टंट न्यूडल्स, व्हिटामिनसह घरात साठा करता येऊ शकणाऱ्या आवश्यक सामानांची यादी प्रसिद्ध केली आहे. लोकांची खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता चीनच्या सरकारी माध्यमांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी विनाकारण चिंता करू नये, असं आवाहन चिनी कम्युनिस्ट पक्षाचं समर्थन करणाऱ्या 'द इकॉनॉमिक डेली' या वृत्तपत्रानं केलं आहे.

टॅग्स :chinaचीन