शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

COP26 Summit: जगासाठी ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ अत्यंत आवश्यक; पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 00:29 IST

COP26 Summit: या परिषदेत स्वच्छ तंत्रज्ञान नवकल्पना आणि विकासाला गती देणे या विषयावर पंतप्रधान मोदींनी भूमिका मांडली.

ग्लासगो: ग्लासगो येथे आयोजित वर्ल्ड लीडर समिट ऑफ कोप-२६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण आपल्या हातांनी नैसर्गिक समतोल ढळू दिला आहे. मात्र, तंत्रज्ञानाने आपल्या एक उत्तम संधी दिली आहे. जगभरातील मानवतेच्या संरक्षणासाठी आपण सूर्याची अक्षय ऊर्जा घेऊनच पुढे गेले पाहिजे. यासाठी ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. 

या परिषदेत स्वच्छ तंत्रज्ञान नवकल्पना आणि विकासाला गती देणे या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जीवाश्म इंधनाच्या उपयोगाने काही देशांना समृद्ध केले, हे खरे असले तरी यामुळे पृथ्वी आणि पर्यावरणाची अतोनात हानी झाली. या इंधनाच्या तीव्र स्पर्धेमुळे भू-राजकीय तणाव निर्माण झाला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ आवश्यक

सौर उर्जा पूर्णपणे स्वच्छ आणि टिकाऊ आहे. मात्र, केवळ दिवसापुरतीच ही ऊर्जा आपण वापरात आणू शकतो तसेच हवामानावरही अधिक अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ते जास्त आव्हानात्मक आहे. यासाठीच ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ म्हणजेच एक सूर्य, एक जग आणि वीजवाहक तारांचे जाळे निर्माण करणे हाच यावरील उत्तम उपाय आहे. विश्वव्यापी ग्रीडच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेला कुठेही आणि कधीही प्रेषित करता येऊ शकेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

दरम्यान, हवानबदलाची ही समस्या गंभीर असून सन २०७० पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल. भारत रिन्यूएबल एनर्जी निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील पूर्ण लोकसंख्येच्या अर्धे लोक भारतात वर्षभरात फक्त रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने सन २०३० पर्यंत उत्सर्जनाच्या बाबतीत नेट झिरोवर येण्याचे लक्ष्य समोर ठेले आहे. भारत २०३० पर्यंत गैर-जीवाश्म ऊर्जेच्या क्षमतेला ५०० गीगावॅटपर्यंत पोहोचवेल. २०३० पर्यंत भारत आपल्या उर्जासंबंधीच्या ५० टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल. तसेच भारत २०३० पर्यंत एकूण अंदाजित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी म्हटले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी