शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

परवेझ मुशर्रफ यांची २३ पक्षांची महाआघाडी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:19 IST

           पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.    

ठळक मुद्दे ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’च्या स्थापनेने नवी समीकरणे    

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

            स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांनी दुबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला संबोधित करताना म्हटले की, मुहाजिर समुदायाचे प्रतिनिधित्व करणाºया सर्व पक्षांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाक सरजमी पार्टी (पीएसपी) यांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या आघाडीच्या स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, सर्व सदस्य पक्ष एकाच नावाने सोबत निवडणुका लढतील.    

मुशर्रफ हे एमक्यूएमचे नेतृत्व करीत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. एखाद्या अल्पसंख्यांक पक्षाचे नेतृत्व मी करणे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले की, एमक्यूएम-पाकिस्तानचे जे अस्तित्व मूळ स्वरूपात होते ते आता फक्त अर्ध्यावर आले आहे. पक्षाच्या अंतर्गत समस्येबाबत मी चिंतित आहे. जर हा पक्ष एकजूट राहत असेल तर, फारुक सत्तार अथवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला काही स्वारस्य नाही. एमक्यूएमवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आणि मुहाजिर समुदाय आदर हरवून बसले आहेत.              पाकिस्तान मुस्लिम लीग-कायदचे नेते चौधरी शुजात आणि चौधरी परवेज इलाही हेही त्यांच्या महाआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास मुशर्रफ यांनी व्यक्त केला, तर पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुशर्रफ यांनी केले. 

मुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. यावर्षी आॅगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी असा दावा केला की, सर्व आरोपांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. कारण, न्यायालये नवाज शरीफ यांच्या नियंत्रणात नाहीत.