शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांचे अच्छे दिन!, बांगलादेश, भूतान हे देशही अधिक आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:58 IST

दहशतवादी संघटनांचे माहेरघर, सातत्याने होणारे हल्ले यांमुळे पाकिस्तान बदनाम असला तरी तेथील नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सुखी आणि आनंदी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून समोर आले आहे.

नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांचे माहेरघर, सातत्याने होणारे हल्ले यांमुळे पाकिस्तान बदनाम असला तरी तेथील नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सुखी आणि आनंदी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून समोर आले आहे. सर्वात आनंदी देश फिनलँड ठरला आहे. भारतापेक्षा बहुतांश शेजारी देशही अधिक आनंदी व खूश असल्याचे अहवालात म्हटले आहे.दरवर्षी ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ प्रसिद्ध करण्यात येतो. सामाजिक सद्भाव, भ्रष्टाचार व लोकांच्या अपेक्षा अशा मुद्द्यांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. १५६ आनंदी देशांच्या यादीत भारत १३३ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान या यादीत ७५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बांगलादेश, भूतानसारखी शेजारी राष्ट्रेही भारतापेक्षा अधिक आनंदी असल्याचे यात म्हटले आहे. क्रमवारीत नेपाळ, चीन आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत.>१0 स्वस्त शहरांत भारतातील तीनजगातील १0 स्वस्त शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई व दिल्ली या शहरांचा समावेश आहे. एका सर्व्हेमध्ये हे आढळून आले आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने केलेल्या सर्वेक्षणात सिंगापूर हे सर्वात महागडे शहर असल्याचे दिसून आले आहे. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. जगातील सर्वात स्वस्त शहर आहे सिरियाची राजधानी असलेले दमास्कस. बंगळुरू पाचव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर असून, दिल्ली शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. दुसऱ्या व तिसºया स्थानावर व्हेनेझुएलाची राजधानी काराकस व कझाकिस्तानची राजधानी अलमाटी यांचा क्रमांक लागतो. लागोस शहर चौथ्या व पाकिस्तानमधील कराची सहाव्या क्रमांकावर आहे. अल्जिअर्स व बुखारेस्ट ही शहरे सातव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.11 क्रमांकांनी झाली घसरण२०१७ मधील ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’मध्ये भारताची चार क्रमांकांनी घसरण झाली होती. यंदा भारत ११ क्रमांकांनी घसरला आहे.>फिनलँड सर्वाधिक आनंदी कशामुळे?फिनलँडमधील आनंदामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हेलसिंकी येथील सोफिया होल्म (२४) म्हणाल्या की, फिनलँडमधील राजकारण आणि अर्थकारण खूपच सकारात्मक आणि चांगले आहे. त्यामुळे देशात सुखी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे येथील लोक आनंदी आहेत.