शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

"पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होणार, 1971 सारखे हाल होणार..."; पाक खासदाराचा भरसंसदेत मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:16 IST

"बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात..."

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इस्लामिक धार्मिक नेते तथा खासदार मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानला १९७१ ची आठवण करून दिली आहे. तेव्हा पूर्व पाकिस्तान तुटून बांगलादेशची निर्मिती झाली होती. मौलाना फजलुर रहमान यांनी दावा केला आहे की, "बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात." भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत, अशीच स्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

याशिवाय, बलुचिस्तानातील जिल्ह्यांनी स्वतःला स्वातंत्र घोषित केले, तर संयुक्त राष्ट्र देखील त्यांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, काही शक्तिशाली लोक बंद खोलीत बसून निर्णय घेतात आणि त्याचे पालन सरकारला करावे लागते, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.

पाकिस्तानच्या वायव्य कुर्रम भागात पुन्हा हिंसाचार उफाळून आला असताना मौलाना फजलुर रहमान यांचे हे विधान आले आहे. हा भाग गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानातील शिया-सुन्नी संघर्षाचे केंद्र आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या नव्या लढाईत आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. हा पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला एक डोंगराळ भाग आहे. मोठ्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लढवय्यांमधील संघर्षांमुळे हा भाग जगापासून जवळजवळ तुटलेला आहे. येथे अनेक वेळा युद्धबंदीचे प्रयत्न झाले, मात्र हिंसाचार थांबला नाही.

पाकिस्तानी पंतप्रधानांवरह निशाणा -जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान सभागृहात म्हणाले, "जर मी पंतप्रधानांना विचारले की बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा किंवा आदिवासी भागात काय सुरू आहे? तर कदाचित ते म्हणतील की, त्यांना माहिती नाही." सैन्याचे नाव न घेता ते म्हणाले, "पाकिस्तानमध्ये नागरी सरकारचे नियंत्रण नाही. येथे एक अशी संस्था निर्माण झाली आहे, जी बंद खोलीत काही निर्णय घेते आणि सरकारला त्यावर अंगठा लावावा लागतो."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानParliamentसंसद