शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
4
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
5
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
6
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
7
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
8
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
9
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
10
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
11
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
12
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
13
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
14
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
15
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
17
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
18
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
19
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
20
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...

"पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होणार, 1971 सारखे हाल होणार..."; पाक खासदाराचा भरसंसदेत मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:16 IST

"बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात..."

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इस्लामिक धार्मिक नेते तथा खासदार मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानला १९७१ ची आठवण करून दिली आहे. तेव्हा पूर्व पाकिस्तान तुटून बांगलादेशची निर्मिती झाली होती. मौलाना फजलुर रहमान यांनी दावा केला आहे की, "बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात." भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत, अशीच स्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

याशिवाय, बलुचिस्तानातील जिल्ह्यांनी स्वतःला स्वातंत्र घोषित केले, तर संयुक्त राष्ट्र देखील त्यांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, काही शक्तिशाली लोक बंद खोलीत बसून निर्णय घेतात आणि त्याचे पालन सरकारला करावे लागते, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.

पाकिस्तानच्या वायव्य कुर्रम भागात पुन्हा हिंसाचार उफाळून आला असताना मौलाना फजलुर रहमान यांचे हे विधान आले आहे. हा भाग गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानातील शिया-सुन्नी संघर्षाचे केंद्र आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या नव्या लढाईत आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. हा पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला एक डोंगराळ भाग आहे. मोठ्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लढवय्यांमधील संघर्षांमुळे हा भाग जगापासून जवळजवळ तुटलेला आहे. येथे अनेक वेळा युद्धबंदीचे प्रयत्न झाले, मात्र हिंसाचार थांबला नाही.

पाकिस्तानी पंतप्रधानांवरह निशाणा -जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान सभागृहात म्हणाले, "जर मी पंतप्रधानांना विचारले की बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा किंवा आदिवासी भागात काय सुरू आहे? तर कदाचित ते म्हणतील की, त्यांना माहिती नाही." सैन्याचे नाव न घेता ते म्हणाले, "पाकिस्तानमध्ये नागरी सरकारचे नियंत्रण नाही. येथे एक अशी संस्था निर्माण झाली आहे, जी बंद खोलीत काही निर्णय घेते आणि सरकारला त्यावर अंगठा लावावा लागतो."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानParliamentसंसद