शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:34 IST

पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती

इस्लामाबाद : भारताने ९-१० मे दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केलेल्या प्रहारामुळे पाकिस्तानचा नियोजित हल्ला फसला, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. रावळपिंडीतील नूर खान विमानतळासह ११ ठिकाणी भारताने निशाणा साधला होता. पाकिस्तानने पश्चिम सीमेलगत भारतीय नागरी भागांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली.

ते म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधीच भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर असून भारत-पाक संघर्षाबाबत बुधवारी अझरबैजानच्या लाचिन शहरात दिलेल्या भाषणात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

अझरबैजान-तुर्कस्तान-पाकिस्तान अशा त्रिपक्षीय परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारताच्या 'आक्रमक भूमिके'मुळेच दोन्ही देशांतील संघर्ष वाढला. त्याने हल्ला केल्यावर आम्हाला देशाच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (वृत्तसंस्था)

लढाईचे स्वरूपच बदलले 

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करत अत्यंत अचूकपणे पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले. 

भारतीय शहरांवर हल्ला पाकिस्तानकडून त्यानंतर ड्रोनद्वारे करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० आणि आकाश यांनी ते ड्रोन पाडले. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनिर यांनी शांती प्रस्थापित होण्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा सल्ला दिला. भारताशी संघर्ष अधिक न वाढवता तो थांबवावा असे माझेही मत होते, असे शरीफ म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान