शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:34 IST

पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती

इस्लामाबाद : भारताने ९-१० मे दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केलेल्या प्रहारामुळे पाकिस्तानचा नियोजित हल्ला फसला, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. रावळपिंडीतील नूर खान विमानतळासह ११ ठिकाणी भारताने निशाणा साधला होता. पाकिस्तानने पश्चिम सीमेलगत भारतीय नागरी भागांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली.

ते म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधीच भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर असून भारत-पाक संघर्षाबाबत बुधवारी अझरबैजानच्या लाचिन शहरात दिलेल्या भाषणात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

अझरबैजान-तुर्कस्तान-पाकिस्तान अशा त्रिपक्षीय परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारताच्या 'आक्रमक भूमिके'मुळेच दोन्ही देशांतील संघर्ष वाढला. त्याने हल्ला केल्यावर आम्हाला देशाच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (वृत्तसंस्था)

लढाईचे स्वरूपच बदलले 

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करत अत्यंत अचूकपणे पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले. 

भारतीय शहरांवर हल्ला पाकिस्तानकडून त्यानंतर ड्रोनद्वारे करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० आणि आकाश यांनी ते ड्रोन पाडले. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनिर यांनी शांती प्रस्थापित होण्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा सल्ला दिला. भारताशी संघर्ष अधिक न वाढवता तो थांबवावा असे माझेही मत होते, असे शरीफ म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान