शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सूफी दर्गा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाग, 100 दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: February 18, 2017 08:48 IST

सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. लाल शाहबाज कलंदर येथे गुरुवारी आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात १00 भाविक ठार, तर २५० हून अधिक जखमी झाले होते. लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतानाही या आठवड्यात देशात अनेक हल्ले झाले. सुफी दर्ग्यावरील हल्ला सर्वात घातक होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 'देशात सांडलेल्या रक्ताच्या थेंबा थेबाचा हिशेब घेतला जाईल. आता संयम बाळगणार नाही', असं म्हटलं होतं.
 
(पाकमध्ये ३९ दहशतवाद्यांचा खात्मा)
 
पाकिस्तान लष्कराने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरदेखील सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. लष्कराने तेथेदेखील काही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातदेखील 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पेशावरमधील रेगी परिसरात एका सर्च ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान सीमारेषेलगत असलेल्या चेकपोस्टवरही दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत चार दहशतवादी ठार करण्यात आले. 
 
13 फेब्रुवारीनंतर पाकिस्तानमध्ये एकूण आठ दहशतवादी हल्ले झाले आहेत. सोमवारी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले होते. त्याचदिवशी बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येदेखील स्फोट झाला होता. मंगळवारी क्वेटामध्ये बॉम्ब निकामी करत असताना पथकातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान नेहमी चांगलं आणि वाईट तालिबान असा फरक करत आला आहे. तसंच भारत आणि अफगाणिस्तानात होणा-या दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोप अफगाणिस्तान सुरुवातीपासून करत आला आहे. 
 
पाकिस्तान लष्कराने पाक-अफगाण सीमेजवळील शालमान भागात मोहीम सुरू केली असून, यात तोफांचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून पाक-अफगाण सीमा तोखराम येथे बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाकमध्ये एकापाठोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकापाठोपाठ कारवाई सुरू केली. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी उच्चपदस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सहमती दर्शविली होती. सुफी दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने आपल्या आमाक या वृत्तसंस्थेद्वारे स्वीकारली होती.