शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाकिस्तान भेदरला... म्हणाला, भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:16 IST

सशस्त्र दले व जनतेला सज्ज राहण्याचे पाक सरकारचे आवाहन

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत भारताच्या आक्रमणाला ‘आम्ही आमच्या पसंतीची वेळी आणि ठिकाणी’ प्रत्युत्तर देण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी निर्धार केला. मात्र पाकिस्तानचा सूर नरमाईचा दिसत आहे.

हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरक्षा समितीची बैठक घेतली. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र दले व जनतेला कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. भारताच्या आक्रमणात कोणीही मरण पावलेले नाही, असा पाकचा दावा आहे. ३५0 दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा पाकच्या सुरक्षा समितीने फेटाळून लावला. बालाकोट भागात जैशचे दहशतवादी तळ नाहीतच, असा दावाही पाकिस्तानने केला आहे.सुरक्षा समितीने जगातील प्रसार माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र या प्रसारमाध्यमांना पाकिस्तान सरकार कोणते ठिकाण दाखवणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी म्हणाले की, भारताने एलओसीच्या पलीकडे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ . भारताने ज्या भागात हल्ला केला त्या भागात ‘जैश-ए- मोहम्मद’चे तळ नाहीत. भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रचार केला जात आहे. सुरक्षा समितीने म्हटले आहे की, भारताला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देईल.पाकिस्तानने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशननिवडणुकीच्या काळात फायदा लाटण्यासाठी भारताने ही कारवाई केल्याचा दावा करत, यामुळे विभागीय शांतता आणि स्थैर्य धोक्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. तसेच देशाला विश्वासात घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने संसदेचे संयुक्तअधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कारवाईची माहिती देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान जगभरातील नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांनी बुधवारी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान