शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पाकिस्तान भेदरला... म्हणाला, भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:16 IST

सशस्त्र दले व जनतेला सज्ज राहण्याचे पाक सरकारचे आवाहन

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत भारताच्या आक्रमणाला ‘आम्ही आमच्या पसंतीची वेळी आणि ठिकाणी’ प्रत्युत्तर देण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी निर्धार केला. मात्र पाकिस्तानचा सूर नरमाईचा दिसत आहे.

हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरक्षा समितीची बैठक घेतली. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र दले व जनतेला कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. भारताच्या आक्रमणात कोणीही मरण पावलेले नाही, असा पाकचा दावा आहे. ३५0 दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा पाकच्या सुरक्षा समितीने फेटाळून लावला. बालाकोट भागात जैशचे दहशतवादी तळ नाहीतच, असा दावाही पाकिस्तानने केला आहे.सुरक्षा समितीने जगातील प्रसार माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र या प्रसारमाध्यमांना पाकिस्तान सरकार कोणते ठिकाण दाखवणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी म्हणाले की, भारताने एलओसीच्या पलीकडे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ . भारताने ज्या भागात हल्ला केला त्या भागात ‘जैश-ए- मोहम्मद’चे तळ नाहीत. भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रचार केला जात आहे. सुरक्षा समितीने म्हटले आहे की, भारताला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देईल.पाकिस्तानने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशननिवडणुकीच्या काळात फायदा लाटण्यासाठी भारताने ही कारवाई केल्याचा दावा करत, यामुळे विभागीय शांतता आणि स्थैर्य धोक्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. तसेच देशाला विश्वासात घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने संसदेचे संयुक्तअधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कारवाईची माहिती देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान जगभरातील नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांनी बुधवारी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान