शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 09:37 IST

शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला

पाकिस्तानच्या अशांत उत्तर पश्चिममधील कुर्रम जिल्ह्यात शिया आणि सुन्नी समुदायात जोरदार संघर्ष सुरू आहे. याठिकाणी मंगळवारी कमीत कमी १० लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झालेत. गेल्या ७ दिवसात या संघर्षात १०० लोक मारले गेलेत. संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसून हिंसक आंदोलन आणखी भडकत आहे. गोजाघारी, मातासानगर आणि कुंज परिसरात हा संघर्ष पेटला आहे.

कुर्रम जिल्ह्यातील उपआयुक्त जावेदुल्लाह महसूद यांनी पुढाकार घेत दोन्ही समुदायात एक करार केला. त्यात संघर्ष विराम करण्यासाठी १० दिवसांची सहमती झाली. मागील आठवडाभरात १०० लोकांनी जीव गमावला आहे तर १८० जण जखमी झालेत. सर्व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी बंदोबस्ताला आहेत. पोलीस आणि सैन्याचे जवानही कुर्रम जिल्ह्यात तैनात केले आहेत. कुर्रम जिल्ह्यातील अलीजाई आणि बगान समुदायाच्या संघर्षाची ठिणगी पराचनार येथे प्रवासी बसवर झालेल्या हल्ल्यात ४७ जण मृत्युमुखी पडल्यानंतर पेटली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही समुदायात संघर्ष झाला आणि हिंसेत ३७ लोक मारले होते. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतली नाही.

शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला. मात्र नंतर त्यात वाढ झाली असून अजूनही हिंसाचार सुरूच आहे. कुर्रम जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा झाला आहे. पराचनार येथे झालेल्या हिंसाचारानंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधांची आवक कमी आहे. रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या पख्तुनख्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

सुन्नीबहुल पाकिस्तानातील २४ कोटी लोकसंख्येपैकी १५ टक्के शिया मुस्लिम आहेत. दोन्ही गट साधारणपणे शांततेने एकत्र राहत असले तरी, विशेषतः कुर्रममध्ये तणाव कायम असतो. सध्याच्या हिंसाचाराचा संबंध जमिनीच्या वादाशी आहे. काही दिवसांपूर्वी  पख्तूनख्वामध्ये शिया मुस्लिम नागरिकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMuslimमुस्लीम