शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Pakistan Crisis: पाकचे पंतप्रधान राजीनामा देणार? ३ नवीन पर्यायांवर चर्चा; ...तर लष्करी राजवट येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 08:50 IST

देशाला आर्थिक संकटातून कसे बाहेर काढायचे या चर्चेला पुन्हा वेग आला असून, तीन पर्याय समोर आले आहेत.

इस्लामाबाद : पाकिस्तानवरील विदेशी कर्ज १०० अब्ज डॉलरवर तर महागाईचा दर ४० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कर्जाचा हप्ता देण्यास तयार नाही. चीनने पुन्हा गुप्त अटींवर ७०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देऊन पाकला आणखी काही दिवस दिवाळखोरीपासून वाचवले. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ खुर्ची सोडू शकतात, असे समोर आले आहे.

अशा परिस्थितीत देशाला आर्थिक संकटातून कसे बाहेर काढायचे या चर्चेला पुन्हा वेग आला असून, तीन पर्याय समोर आले आहेत. पहिला पर्याय : राष्ट्रीय सरकार, दुसरा- टेक्नोक्रॅट सरकार आणि तिसरा - मार्शल लॉ म्हणजे लष्करी शासन. पहिले दोन  पर्याय स्वीकारले न गेल्यास लष्करी राजवटीची मार्ग मोकळा होऊ शकतो. पाकसमोरील तीन पर्यायांची माहिती व ते पर्याय राबविण्यातील अडचणी समजून घेऊ.

राष्ट्रीय सरकारयाचा अर्थ सर्व बड्या पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले पाहिजे. सरकारचा एक समान किमान कार्यक्रम असावा. देशाला सर्व प्रकारच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्व पक्षांना एका मंचावर आणणे हा यामागचा उद्देश आहे. किमान दोन वर्षांचा अवधी द्यावा. जेव्हा पाकिस्तान रुळावर येईल तेव्हा सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात.nअडचण काय आहे? : इम्रान खान याला अजिबात तयार नाहीत. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण विरोधक चोर व लुटारू आहेत. पीडीएमच्या १३ पक्षांमध्येही एकमत नाही.

टेक्नोक्रॅट सरकारयाचा अर्थ असा, की प्रत्येक क्षेत्रातील एक सर्वोत्तम अधिकारी किंवा तज्ज्ञांची मोट बांधून सरकार स्थापन करावे. पंतप्रधानही एखादा तंत्रज्ञच असावा. या सरकारने आर्थिक आघाडी रुळावर आणण्यासाठी काम करावे. देशाची अर्थव्यवस्था सुधारेल तेव्हा निवडणुका घ्याव्यात. परराष्ट्र धोरण सरकारवर सोपवले पाहिजे, पण संरक्षण विभाग आणि लष्कराने त्यांचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवले पाहिजे.nअडचण काय आहे? : इम्रान खान यांच्या पक्षाने ही कल्पना नाकारली. यामुळे महागाईचा बोजा वाढेल, असे त्यांचे मत आहे.

मार्शल लॉ किंवा आर्थिक आणीबाणीहा पर्याय दोन पद्धतीने वापरता येईल. एक म्हणजे काही काळासाठी आर्थिक आणीबाणी लादली जावी. केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच आयात करावी. लष्करी अधिकाऱ्यांच्या ताब्यात सत्ता द्यावी. दुसरा मार्शल लॉ लागू करावा. या काळात राजकीय हालचाली पूर्णपणे गोठवाव्यात.nसमस्या काय आहे? : आयएमएफ व जागतिक बँक आणि वित्तीयसंस्था व पाश्चात्त्य देश हे सहन करणार नाहीत. मित्र देशांनी आधीच अट घातली आहे की आयएमएफ जोपर्यंत कर्ज देत नाही तोपर्यंत तेही मदत करणार नाहीत. अशा स्थितीत दिवाळखोरी निश्चित केली जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान