शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Nuclear Bombs: जगावर मोठे संकट! पाकिस्तान अणुबॉम्ब विक्रीचे प्रयत्न करणार; कोण कोण खरेदीदार असणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:02 IST

पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते.

पाकिस्तानमध्ये आता अंधार पसरला आहे, एवढा की पावर प्लांट दुरुस्त करण्यासाठी देखील पैसे नाहीएत. आर्थिक संकट एवढे गडद झालेय की आता लोकांना फक्त दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली आहे. अशातच सौदी अरेबिया, चीनने पाकिस्तानला मदत देण्यापासून हात काढून घेतला आहे. यामुळे पाकिस्तानकडे आता फक्त एकच गोष्ट उरली आहे, ज्याव्दारे पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर पैसे उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. 

पाकिस्तान आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अणुबॉम्ब जगभरातील देशांना विकू शकतो, असे सांगितले जात आहे. जर हे खरे असले तर जे देश सध्या अण्वस्त्रधारी नाहीत ते पाकिस्तानचे मोठे खरेदीदार ठरू शकणार आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, उत्तर कोरिया सारखे देश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते अहमद अयूब मिर्झा यांनी भारतीय चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तान अखेरचा प्रयत्न म्हणून अण्वस्त्रे विकायला काढू शकतो, असे म्हटले आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तान जगातून पैसे गोळा करण्यासाठी आपल्याकडील युरेनियमचा साठ्याची तस्करी करत असल्याचे बोलले जात आहे. 

यावर मिर्झा यांनी पाकिस्तानात अण्वस्त्र साठा अजिबात सुरक्षित नसल्याचे वाटतेय असे ते म्हणाले. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने एक वॉचडॉगची नियुक्ती करून पाकिस्तानची शस्त्रास्त्रे ताब्यात घ्यावीत, तसेच सर्व प्रकल्पही ताब्यात घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते. अणुसंपन्न देशात दहशतवाद पसरलेला असल्याने जगासाठी पाकिस्तान आता टेन्शन देणारा देश ठरला आहे. अफगाणिस्तानसारखी परिस्थिती पाकिस्तानात झाली आणि टीटीपीसारख्या दहशतवादी संघटनेच्या हाती अणुबॉम्ब आला तर ते संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरेल, अशी चिंता भारतापासून पाश्चिमात्य देशांपर्यंत आहे. पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अणुबॉम्ब आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध