शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Nuclear Bombs: जगावर मोठे संकट! पाकिस्तान अणुबॉम्ब विक्रीचे प्रयत्न करणार; कोण कोण खरेदीदार असणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:02 IST

पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते.

पाकिस्तानमध्ये आता अंधार पसरला आहे, एवढा की पावर प्लांट दुरुस्त करण्यासाठी देखील पैसे नाहीएत. आर्थिक संकट एवढे गडद झालेय की आता लोकांना फक्त दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली आहे. अशातच सौदी अरेबिया, चीनने पाकिस्तानला मदत देण्यापासून हात काढून घेतला आहे. यामुळे पाकिस्तानकडे आता फक्त एकच गोष्ट उरली आहे, ज्याव्दारे पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर पैसे उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. 

पाकिस्तान आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अणुबॉम्ब जगभरातील देशांना विकू शकतो, असे सांगितले जात आहे. जर हे खरे असले तर जे देश सध्या अण्वस्त्रधारी नाहीत ते पाकिस्तानचे मोठे खरेदीदार ठरू शकणार आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, उत्तर कोरिया सारखे देश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते अहमद अयूब मिर्झा यांनी भारतीय चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तान अखेरचा प्रयत्न म्हणून अण्वस्त्रे विकायला काढू शकतो, असे म्हटले आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तान जगातून पैसे गोळा करण्यासाठी आपल्याकडील युरेनियमचा साठ्याची तस्करी करत असल्याचे बोलले जात आहे. 

यावर मिर्झा यांनी पाकिस्तानात अण्वस्त्र साठा अजिबात सुरक्षित नसल्याचे वाटतेय असे ते म्हणाले. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने एक वॉचडॉगची नियुक्ती करून पाकिस्तानची शस्त्रास्त्रे ताब्यात घ्यावीत, तसेच सर्व प्रकल्पही ताब्यात घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते. अणुसंपन्न देशात दहशतवाद पसरलेला असल्याने जगासाठी पाकिस्तान आता टेन्शन देणारा देश ठरला आहे. अफगाणिस्तानसारखी परिस्थिती पाकिस्तानात झाली आणि टीटीपीसारख्या दहशतवादी संघटनेच्या हाती अणुबॉम्ब आला तर ते संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरेल, अशी चिंता भारतापासून पाश्चिमात्य देशांपर्यंत आहे. पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अणुबॉम्ब आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध