शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:04 IST

पाकिस्तानच्या १०० हून अधिक सैनिकांना मारल्याचा बलुच बंडखोरांनी दावा केला आहे.

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला बलुच बंडखोरांनी ओलीस ठेवले. या प्रकरणावरुन अनेक दावे करण्यात आले आहेत.  सुरुवातीला पाकिस्तानने ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले. आता याबाबत नवीनच अपडेट समोर आली आहे.  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ऑपरेशन संपलेले नाही आणि सैन्यासोबतचे युद्ध सुरूच आहे. या गटाने १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावाही केला आहे.

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

गुरुवारी, बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसीर, पाकिस्तानी सैन्य मृतांची खरी संख्या लपवत आहे कारण त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय माध्यमांना चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की त्यांनी ३४० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले आहे. त्यात असेही म्हटले आहे की २८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

बीएलएने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या आयएसपीआरने ऑपरेशन संपल्याचा केलेला दावा खोटा आहे आणि युद्ध अजूनही सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने अद्याप १०० हून अधिक मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची नावे आणि फोटो सार्वजनिक केलेली नाहीत. ३३ बलुच सैनिकांची नावे आणि फोटो देखील अजूनही जाहीर केलेली नाहीत.

पाकिस्तानचे १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे, बलुच बंडखोरांचा दावा आहे. बीएलएने स्फोटाचा एक व्हिडीओ जारी केला, या व्हिडीओत अनेक लढाऊ लपण्याच्या ठिकाणाहून ट्रेनवर हल्ला करण्यासाठी बाहेर येत असल्याचं दिसत आहे.

भारताने प्रत्युत्तर दिले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान